AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anju Nasrullah News | अंजूला पाकिस्तानात रेड कार्पेट ट्रीटमेंट, सरकारी नोकरी, घर मिळणार

Anju Nasrullah News | अंजू भारतात परत येणार. ती का येणार परत? कधी येणार? त्या बद्दल नसरुल्लाहने दिली महत्वाची अपडेट. अंजूने पाकिस्तानात जाऊन नसरुल्लाह बरोबर निकाह केला.

Anju Nasrullah News | अंजूला पाकिस्तानात रेड कार्पेट ट्रीटमेंट, सरकारी नोकरी, घर मिळणार
Anju Love StoryImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 29, 2023 | 7:47 AM
Share

लाहोर : पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतात आलेल्या सीमा हैदरचा विषय अजून संपलेला नाही. त्याचवेळी अंजू नावाची भारतीय महिला पाकिस्तानात पोहोचलीय. सीमेपलीकडची ही दोन्ही प्रेम प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनली आहेत. पाकिस्तानात असलेल्या अंजू बद्दल रोज नवनवीन माहिती समोर येतेय. आता अंजूचा पती नसरुल्लाहने एक नवीन दावा केलाय.

नसरुल्लाहने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकार अंजूला सरकारी नोकरी आणि घर देणार आहे. त्याने असा सुद्धा दावा केलाय की, “काही दिवसात अंजू भारतात येईल आणि आपल्या मुलांना घेऊन पुन्हा पाकिस्तानात येईल. अंजू पाकिस्तानात परतली नाही, तर मी सीमा ओलांडून भारतात येईन” असं नसरुल्लाहने म्हटलं आहे.

नसरुल्लाहने काय दावे केलेत?

पाकिस्तानात राहणाऱ्या नसरुल्लाहने इंडिया डेली नावाच्या एका न्यूज चॅनलशी बोलताना ही माहिती दिली. “पाकिस्तान सरकार अंजूला नोकरीसोबत एक घरही देणार आहे. अंजूने इस्लाम धर्म स्वीकारलाय. त्यामुळे तिला पाकिस्तानी नागरिकता सुद्धा मिळेल. ती जे काही करतेय, ते आपल्या मर्जीने करतेय. अंजू ऑगस्ट महिन्यात भारतात परत येईल. ती आपल्या मुलांना घेऊन पुन्हा पाकिस्तानात येईल” असं नसरुल्लाह म्हणाला.

नसरुल्लाहला कसली भिती आहे?

अंजूची भारतात हत्या होऊ शकते, अशी भिती सुद्धा नसरुल्लाहने व्यक्त केली. “मी भारतात गेली, तर माझ्यावर हल्ला होईल, असं अंजूने मला सांगितलय. ऑगस्ट महिन्यात ती भारतात जाईल आणि मुलांना घेऊन पुन्हा पाकिस्तानात येईल” असं नसरुल्लाह म्हणाला.

अंजूच्या मुलांच धर्म परिवर्तन करणार?

“अंजू तिच्या मुलांना घेऊन पाकिस्तानात परतली नाही, तर मी स्वत: भारतात जाईन आणि तिला, मुलांना सोबत घेऊन पाकिस्तानात येईन” असं नसरुल्लाह म्हणाला. अंजूच्या मुलांच धर्म परिवर्तन केलं जाणार नाही, असं तो म्हणाला. ‘अंजूने स्वीकारला इस्लाम धर्म’

अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला त्या बद्दल नसरुल्लाह व्यक्त झाला. “अंजूवर कुठलाही दबाव टाकलेला नाही. ती मागच्या 3 वर्षांपासून आपल्या नवऱ्यापासून वेगळी राहत होती. कोर्टात तिने घटस्फोटासाठी अर्ज सुद्धा केला होता” असं नसरुल्लाह म्हणाला. “मुलांमुळे अंजू पुन्हा भारतात परतणार आहे. व्हिसा संपण्याआधी ती पुन्हा परत येईल” असा नसरुल्लाहचा दावा आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.