AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मणिपूरमध्ये हिंसा, लष्कराच्या जवानांना हिंसा पसरवणाऱ्यांना पाहता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

मणिपूरमध्ये शांतता भंग करणाऱ्या लोकांना पाहता क्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश जवानांना देण्यात आले आहेत.

मणिपूरमध्ये हिंसा, लष्कराच्या जवानांना हिंसा पसरवणाऱ्यांना पाहता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
| Updated on: May 04, 2023 | 7:05 PM
Share

इंफाळ : मणिपूरमध्ये आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पाऊलं उचलताना दिसत आहे. हिंसाचारग्रस्त भागात हिंसा करणाऱ्यांना दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एजन्सीनुसार, राज्यपालांनी हिंसा करणाऱ्या लोकांना पाहताच गोळ्या घालण्याच्या आदेशाला मंजुरी दिली आहे. हिंसाचारग्रस्त भागात लष्कर आणि आसाम रायफल्सचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

जवानांना घेऊन पोहोचलं विमान

मणिपूरमध्ये हिंसा वाढल्यानंतर जवान तैनात करण्यात आले आहेत. यासाठी एअर इडियांचं विमान जवानांना घेऊन इम्फाळमध्ये पोहोचलं.

4,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

सुरक्षा दलांनी आतापर्यंत 4,000 लोकांना हिंसाचारग्रस्त भागातून बाहेर काढले आहे. आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती, तर पाच दिवस इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी सर्व लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांनी ट्विट केले की, “राज्यातील सर्वांना माझे नम्र आवाहन आहे की, या घडीला शांतता आणि सलोखा राखण्यासाठी सरकारला सहकार्य करावे.”

मणिपूरच्या लोकसंख्येपैकी सुमारे 53 टक्के लोक मैतेई समुदायातील आहेत. इंफाळमध्ये या लोकांची संख्या खूप जास्त आहे.  40 टक्के लोकं आदिवासी समाजातील आहेत. यामध्ये नागा आणि कुकी समाजातील लोकांचा समावेश आहे. राज्यात ​​हिंसाचारानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.