AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मणिपूरमध्ये हिंसा, लष्कराच्या जवानांना हिंसा पसरवणाऱ्यांना पाहता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

मणिपूरमध्ये शांतता भंग करणाऱ्या लोकांना पाहता क्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश जवानांना देण्यात आले आहेत.

मणिपूरमध्ये हिंसा, लष्कराच्या जवानांना हिंसा पसरवणाऱ्यांना पाहता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
| Updated on: May 04, 2023 | 7:05 PM
Share

इंफाळ : मणिपूरमध्ये आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पाऊलं उचलताना दिसत आहे. हिंसाचारग्रस्त भागात हिंसा करणाऱ्यांना दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एजन्सीनुसार, राज्यपालांनी हिंसा करणाऱ्या लोकांना पाहताच गोळ्या घालण्याच्या आदेशाला मंजुरी दिली आहे. हिंसाचारग्रस्त भागात लष्कर आणि आसाम रायफल्सचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

जवानांना घेऊन पोहोचलं विमान

मणिपूरमध्ये हिंसा वाढल्यानंतर जवान तैनात करण्यात आले आहेत. यासाठी एअर इडियांचं विमान जवानांना घेऊन इम्फाळमध्ये पोहोचलं.

4,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

सुरक्षा दलांनी आतापर्यंत 4,000 लोकांना हिंसाचारग्रस्त भागातून बाहेर काढले आहे. आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती, तर पाच दिवस इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी सर्व लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांनी ट्विट केले की, “राज्यातील सर्वांना माझे नम्र आवाहन आहे की, या घडीला शांतता आणि सलोखा राखण्यासाठी सरकारला सहकार्य करावे.”

मणिपूरच्या लोकसंख्येपैकी सुमारे 53 टक्के लोक मैतेई समुदायातील आहेत. इंफाळमध्ये या लोकांची संख्या खूप जास्त आहे.  40 टक्के लोकं आदिवासी समाजातील आहेत. यामध्ये नागा आणि कुकी समाजातील लोकांचा समावेश आहे. राज्यात ​​हिंसाचारानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.