AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मणिपूरमध्ये हिंसा, लष्कराच्या जवानांना हिंसा पसरवणाऱ्यांना पाहता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

मणिपूरमध्ये शांतता भंग करणाऱ्या लोकांना पाहता क्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश जवानांना देण्यात आले आहेत.

मणिपूरमध्ये हिंसा, लष्कराच्या जवानांना हिंसा पसरवणाऱ्यांना पाहता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
shailesh musale
shailesh musale | Updated on: May 04, 2023 | 7:05 PM
Share

इंफाळ : मणिपूरमध्ये आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पाऊलं उचलताना दिसत आहे. हिंसाचारग्रस्त भागात हिंसा करणाऱ्यांना दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एजन्सीनुसार, राज्यपालांनी हिंसा करणाऱ्या लोकांना पाहताच गोळ्या घालण्याच्या आदेशाला मंजुरी दिली आहे. हिंसाचारग्रस्त भागात लष्कर आणि आसाम रायफल्सचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

जवानांना घेऊन पोहोचलं विमान

मणिपूरमध्ये हिंसा वाढल्यानंतर जवान तैनात करण्यात आले आहेत. यासाठी एअर इडियांचं विमान जवानांना घेऊन इम्फाळमध्ये पोहोचलं.

4,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

सुरक्षा दलांनी आतापर्यंत 4,000 लोकांना हिंसाचारग्रस्त भागातून बाहेर काढले आहे. आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती, तर पाच दिवस इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी सर्व लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांनी ट्विट केले की, “राज्यातील सर्वांना माझे नम्र आवाहन आहे की, या घडीला शांतता आणि सलोखा राखण्यासाठी सरकारला सहकार्य करावे.”

मणिपूरच्या लोकसंख्येपैकी सुमारे 53 टक्के लोक मैतेई समुदायातील आहेत. इंफाळमध्ये या लोकांची संख्या खूप जास्त आहे.  40 टक्के लोकं आदिवासी समाजातील आहेत. यामध्ये नागा आणि कुकी समाजातील लोकांचा समावेश आहे. राज्यात ​​हिंसाचारानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक