AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेत नमाज पठणासाठी मिळत होता 2 तासांचा ब्रेक, आता 1937 सुरु असणारी प्रथा बंद

आसाम विधानसभेने शुक्रवारी नमाजासाठी ब्रेक देण्याचा ब्रिटिशकालीन परंपरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे मुस्लिम आमदारांना शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी ब्रेक मिळणार नाही. आसाम विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला.

विधानसभेत नमाज पठणासाठी मिळत होता 2 तासांचा ब्रेक, आता 1937 सुरु असणारी प्रथा बंद
cm himanta sarma
| Updated on: Aug 30, 2024 | 4:34 PM
Share

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 1937 सुरु असणारी प्रथा बंद करण्याचा हा निर्णय आहे. शुक्रवारचा नमाज अदा करण्यासाठी आसाम विधानसभेत दोन तासांची सुट्टी मिळत होती. आता ही सुट्टी यापुढे मिळणार नाही. आसाम विधानसभेत ही प्रथा मुस्लिम लीगचे सदस्य सय्यद सादुल्लाह यांनी सुरू केली होती. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मी विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमरी आणि आमच्या आमदारांचे आभार मानतो.

ब्रिटिशकालीन परंपरा अखेर रद्द

आसाम विधानसभेने शुक्रवारी नमाजासाठी ब्रेक देण्याचा ब्रिटिशकालीन परंपरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुस्लिम आमदारांना शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी ब्रेक मिळणार नाही. आसाम विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. या निर्णयामुळे आसाममध्ये ब्रिटिशकालीन परंपरा संपली आहे.

आसाम विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला सर्व राजकीय पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दिला. भाजप आमदार बिस्वजित फुकन यांनी सांगितले की, भारतात ब्रिटीश काळापासून आसाम विधानसभेत दर शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी सुट्टी दिली जात होती. दुपारी 12 ते 2 दरम्यान दोन तासांचा ब्रेक दिला जात होता. ज्यामध्ये मुस्लिम आमदार दर शुक्रवारी नमाज अदा करत असत. मात्र आता हा नियम आता बदलण्यात आला आहे.

आता असा होणार बदल

लोकसभा, राज्यसभा आणि इतर राज्यांतील विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी ब्रेक देण्याचा निर्णय नाही. यामुळेच आसाम विधानसभेत सुरु असलेली ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. या नियमामुळे सोमवार ते गुरुवारी आसाम विधानसभेचे काम सकाळी 9:30 वाजता सुरु होत होते. परंतु शुक्रवारी सकाळी 9 वाजता काम सुरु होत होते. आता ही परंपरा बंद करण्यात आल्यामुळे शुक्रवारीसुद्धा सकाळी 9:30 वाजता विधानसभेचे काम सुरु होणार आहे.

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....