AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेत नमाज पठणासाठी मिळत होता 2 तासांचा ब्रेक, आता 1937 सुरु असणारी प्रथा बंद

आसाम विधानसभेने शुक्रवारी नमाजासाठी ब्रेक देण्याचा ब्रिटिशकालीन परंपरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे मुस्लिम आमदारांना शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी ब्रेक मिळणार नाही. आसाम विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला.

विधानसभेत नमाज पठणासाठी मिळत होता 2 तासांचा ब्रेक, आता 1937 सुरु असणारी प्रथा बंद
cm himanta sarma
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 30, 2024 | 4:34 PM
Share

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 1937 सुरु असणारी प्रथा बंद करण्याचा हा निर्णय आहे. शुक्रवारचा नमाज अदा करण्यासाठी आसाम विधानसभेत दोन तासांची सुट्टी मिळत होती. आता ही सुट्टी यापुढे मिळणार नाही. आसाम विधानसभेत ही प्रथा मुस्लिम लीगचे सदस्य सय्यद सादुल्लाह यांनी सुरू केली होती. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मी विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमरी आणि आमच्या आमदारांचे आभार मानतो.

ब्रिटिशकालीन परंपरा अखेर रद्द

आसाम विधानसभेने शुक्रवारी नमाजासाठी ब्रेक देण्याचा ब्रिटिशकालीन परंपरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुस्लिम आमदारांना शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी ब्रेक मिळणार नाही. आसाम विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. या निर्णयामुळे आसाममध्ये ब्रिटिशकालीन परंपरा संपली आहे.

आसाम विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला सर्व राजकीय पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दिला. भाजप आमदार बिस्वजित फुकन यांनी सांगितले की, भारतात ब्रिटीश काळापासून आसाम विधानसभेत दर शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी सुट्टी दिली जात होती. दुपारी 12 ते 2 दरम्यान दोन तासांचा ब्रेक दिला जात होता. ज्यामध्ये मुस्लिम आमदार दर शुक्रवारी नमाज अदा करत असत. मात्र आता हा नियम आता बदलण्यात आला आहे.

आता असा होणार बदल

लोकसभा, राज्यसभा आणि इतर राज्यांतील विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी ब्रेक देण्याचा निर्णय नाही. यामुळेच आसाम विधानसभेत सुरु असलेली ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. या नियमामुळे सोमवार ते गुरुवारी आसाम विधानसभेचे काम सकाळी 9:30 वाजता सुरु होत होते. परंतु शुक्रवारी सकाळी 9 वाजता काम सुरु होत होते. आता ही परंपरा बंद करण्यात आल्यामुळे शुक्रवारीसुद्धा सकाळी 9:30 वाजता विधानसभेचे काम सुरु होणार आहे.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!