AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिराच्या चर्चेदरम्यान लोकसभेत बाबरी मशीद झिंदाबादचे नारे, अमित शहा म्हणाले, इतिहास ओळखत नाहीत ते…

लोकसभेत 'बाबरी मशीद होती, आहे आणि राहील... बाबरी मशीद जिंदाबाद, भारत जिंदाबाद' अशा घोषणा आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गृहमंत्री अमित शहा यांनी या घोषणाबाजीला उत्तर देताना '22 जानेवारी हा 10 हजार वर्षांचा ऐतिहासिक दिवस असणार आहे हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे.

राम मंदिराच्या चर्चेदरम्यान लोकसभेत बाबरी मशीद झिंदाबादचे नारे, अमित शहा म्हणाले, इतिहास ओळखत नाहीत ते...
| Updated on: Feb 10, 2024 | 5:00 PM
Share

नवी दिल्ली | 10 फेब्रुवारी 2024 : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अखरेचा दिवस आहे. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी ‘राममंदिर निर्माण आणि प्राणप्रतिष्ठा’ या विषयावरील आभाराच्या प्रस्तावावर चर्चा झाली. या प्रस्तावादरम्यानच लोकसभेत ‘बाबरी मशीद होती, आहे आणि राहील… बाबरी मशीद जिंदाबाद, भारत जिंदाबाद’ अशा घोषणा आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गृहमंत्री अमित शहा यांनी या घोषणाबाजीला उत्तर देताना ’22 जानेवारी हा 10 हजार वर्षांचा ऐतिहासिक दिवस असणार आहे हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. जे इतिहास ओळखत नाहीत ते आपले अस्तित्व गमावून बसतात.’ असा टोला लगावला.

लोकसभेत राम मंदिर उभारणीसाठी आभाराच्या चर्चेदरम्यान एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी पीव्ही नरसिंह राव आणि लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याच्या पुरस्कारावर प्रश्न उपस्थित केले. शिवसेना (शिंदे गट) खासदार त्यांच्या भाषणात म्हणाले की, 6 डिसेंबरला बाबरी मशीद शहीद झाली तेव्हा माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव पूजा करत होते. मला त्रास देऊ नका, मी. मी पूजा करतोय असे नरसिंह राव म्हणाले होते. मस्जिद शहीद झाली तेव्हा जी व्यक्ती पूजा करत होता आणि ज्या व्यक्तीने मशीद पाडण्यासाठी रथयात्रा काढली त्यांना केंद्र सरकारने भारताच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. हे न्याय जिवंत आहे की अत्याचार कायम आहे हेच सांगते, अशी टीका असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी केली.

मर्यादा पुरुषोत्तम राम यांचा आदर आहेच. पण, नथुराम गोडसे याचा आम्ही द्वेष करतो. कारण, त्याने अशा व्यक्तीला गोळ्या घातल्या ज्याच्या तोंडातून ‘हे राम’ हे शेवटचे शब्द निघाले. पंतप्रधान येथे उत्तर देतील तेव्हा ते 140 कोटी जनतेचे पंतप्रधान म्हणून बोलतील की ते हिंदुत्वाचे नेते म्हणून बोलतील. अयोध्येत मशीद होती, आहे आणि राहील. बाबरी मशीद चिरंजीव आहे. बाबरी मशीद जिंदाबाद अशा घोषणाही असदुद्दीन ओवेसी यांनी दिल्या.

असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणातून त्यांचा समाचार घेतला. 22 जानेवारी हा दिवस 1528 मध्ये सुरू झालेल्या अन्यायाविरुद्धच्या संघर्ष आणि चळवळीचा शेवट आहे. न्यायाचा लढा इथे संपला. जे इतिहास ओळखत नाहीत ते आपले अस्तित्व गमावून बसतात, अशी टीकाही त्यांनी केली.

अमित शहा यांचे भाषण सुरु असतानाच असदुद्दीन ओवेसी हे सभागृहातून निघून गेले. भाजपचे ज्येष्ठ नेते सत्यपाल सिंह यांनी या चर्चेला सुरुवात केली होती. पीएम मोदी यांच्या आगमनानंतर देशात रामराज्य आले आहे असे ते म्हणले. लोकसभेत राम मंदिरावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन एक दिवसाने वाढवण्यात आले आहे.

मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.