AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका, कोण आहे याचिकाकर्ता?

akshay shinde encounter: मुंबईतील एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या वकिलाने जनहित याचिका दाखल करत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली आहे.

अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका, कोण आहे याचिकाकर्ता?
Akshay Shinde
| Updated on: Sep 28, 2024 | 11:42 AM
Share

akshay shinde encounter: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर काही दिवसांपूर्वी झाले होते. त्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. दुसरीकडे  या प्रकरणावर मुंबई उच्च न्यालालयाने राज्य शासनाला चांगलेच फटकारले होते. न्यायालयाकडून अनेक प्रश्न उपस्थित करत एन्काऊंटरसंदर्भात शंका उपस्थित केली होती. उच्च न्यायालय या प्रकरणावर तीन ऑक्टोंबर रोजी सुनावणी करणार आहे. त्यापूर्वी मुंबईतील एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या वकिलाने जनहित याचिका दाखल करत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली आहे.

कोणी केली मागणी

मुंबईतील वकील घनश्याम उपाध्याय हे अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. त्यांनी या प्रकरणात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची निर्मिती करा, अशी मागणी जनहित याचिकेतून करण्यात आली आहे.

या ही केल्या मागण्या

अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटर प्रकरणी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करणे, या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून करावा, त्या एसआयटीत केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) मधील अधिकाऱ्यांचा समावेश असावा, पोलीस कर्तव्य बजावताना बॉडी कॅमच्या वापराद्वारे पोलीस अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांना द्यावेत, अशा मागण्याही घनश्याम उपाध्याय यांनी याचिकेत केल्या आहेत.

सीबीआयकडे तपास देण्यास विरोध

घनश्याम उपाध्याय यांनी याचिकेते तपास पूर्णपणे सीबीआयकडे देण्यास विरोध केला आहे. कारण नुकतेच सर्वोच्च न्यायालयानेही काही प्रकरणांमध्ये सीबीआयला ‘पिंजऱ्यात बंदिस्त पोपटा’ म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी आणि त्या एसआयटीत सीबीआयचे अधिकारी असावे, असे त्यांनी सुचवले आहे. तसेच या एसआयटीचे नेतृत्व सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांनी करावे, असे म्हटले आहे.

23 सप्टेंबर रोजी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर झाले होते. त्याला तळोजा कारागृहातून दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस ठाण्याकडे नेत असताना त्याने एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावली होती. त्यानंतर गोळीबार केले होता. त्याला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा… अक्षयने आधी शिवी दिली, मग हवालदार तावडेंच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या…एन्काऊंटर करणाऱ्या इन्स्पेक्टर संजय शिंदे यांनी सांगितले नेमके काय घडले?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.