AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ढाकात दुर्गादेवी मंदिरातील तोडफोडीनंतर भारत संतापला, मोहम्मद युनूस सरकारला कठोर शब्दांत फटकारले

भारत बांगलादेशसोबत सर्व मुद्द्यांवर शांततापूर्ण आणि सकारात्मक वातावरणात चर्चा करण्यास तयार आहे. बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांवर होणारे दडपशाही रोखण्यात सरकार अपयशी ठरत आहे, असे भारताने म्हटले आहे.

ढाकात दुर्गादेवी मंदिरातील तोडफोडीनंतर भारत संतापला, मोहम्मद युनूस सरकारला कठोर शब्दांत फटकारले
Muhammad YunusImage Credit source: tv9 marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 27, 2025 | 8:10 AM
Share

बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर अल्पसंख्याकांवर सातत्याने हल्ले होत आहेत. मंदिर, चर्चमध्ये तोडफोड केली जात आहे. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या काळात बांगलादेशातील अल्पसंख्याक असुरक्षित बनले आहेत. राजधानी ढाका येथे दुर्गा मंदिराची तोडफोड करण्यात आली. भारताने या घटनेवर तीव्र निषेध नोंदवला. भारताने बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेबद्दल आणि धार्मिक स्थळांच्या संरक्षणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

हल्ले रोखण्यात सरकार अपयशी

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, हिंदू समुदाय आणि धार्मिक स्थळांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही बांगलादेशच्या अंतरिम सरकारची जबाबदारी आहे. भारत बांगलादेशसोबत सर्व मुद्द्यांवर शांततापूर्ण आणि सकारात्मक वातावरणात चर्चा करण्यास तयार आहे. बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांवर होणारे दडपशाही रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल भारताने यापूर्वी अनेक वेळा अंतरिम सरकारवर टीका केली आहे.

सरकारने सुरक्षा दिली नाही

ढाका येथील दुर्गा मंदिर पाडल्याबद्दल जयस्वाल यांनी बांगलादेशी अधिकाऱ्यांवर टीका केली. ते म्हणाले, जिहादी लोक ढाका येथील खिल खेत येथील दुर्गा मंदिर पाडण्याचा प्रयत्न करत होते, हे सरकारला माहीत होते. त्यानंतरही मंदिराला सुरक्षा दिली नाही. उलट अंतरिम सरकारने या घटनेला बेकायदेशीर जमिनीचा वापर केला, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बांगलादेशात या पद्धतीच्या घटना वारंवार घडत आहेत. याबद्दल आम्हाला निराशा आहे.

१९९६ च्या गंगा पाणी कराराचे नूतनीकरण करण्यासाठी भारत आणि बांगलादेशमध्ये चर्चा सुरू होणार आहे. हा करार सन २०२६ मध्ये पूर्ण होत आहे. त्याबाबत जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नवी दिल्ली सर्व बाबींवर ढाकाशी चर्चा करण्यास तयार आहे. दोन्ही पक्षांसाठी चांगल्या चर्चेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करता येईल. दोन्ही देशांतील गंगा पाणी करारावर १२ डिसेंबर १९९६ रोजी झाला होता. भारताचे तत्कालीन पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यावर स्वाक्षरी केली होती.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!