AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार, प्रत्येक संकटात पाठिशी उभ्या राहणाऱ्या भारताचा गौरव!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतान सरकारने भूतानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत भूतानच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. त्यासाठीच हा गौरव केला जातोय.

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार, प्रत्येक संकटात पाठिशी उभ्या राहणाऱ्या भारताचा गौरव!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार स्वीकारण्याचे भूतान सरकारचे आमंत्रण
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 17, 2021 | 11:46 AM
Share

भारताचा शेजारी देश भूतानने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भूतान देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्काराने (Highest civilian Award) सन्मानित केले आहे. भूतानचे पंतप्रधान लोटे शेरींग यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली. कोरोनासारख्या जागतिक संकटात भारताने भूतानला (Bhutan) हरतऱ्हेची मदत केली. त्यामुळेच भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आणि सहाकार्य या आधारे हा पुरस्कार देण्यात आला. इतरही अनेक आघाड्यांवर भारताने नेहमी भूतानची साथ दिली आहे. म्हणूनच भूतानवासियांकडून शुभेच्छा देत तेथील पंतप्रधानांनी या पुरस्काराची घोषणा केली असून तो स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी यांना भूतानमध्ये येण्याचे जाहीर आमंत्रण दिले आहे.

भूतानच्या PMO चे ट्विट

भूतानच्या पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने जारी ट्विटरवर या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. फेसबुकवरदेखील भूतानच्या पीएमओने जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, आतापर्यंतच्या सर्व भेटींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान व्यक्ती आणि आध्यात्मिक व्यक्ती वाटले. भूतानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देण्याच्या पुरस्कारात आपण उपस्थित रहावे, अशी आशा करतो.

कोरोना संकटात भारताची मोठी साथ

जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना काळात भारताने भूतानची मोठी मदत केली. एअर इंडियाच्या विमानांनी ऑक्सफर्ड- अॅस्ट्राजेनेकाच्या कोव्हिशील्ड या लसींचे लाखो डोस भारतातून भूतानला पाठवण्यात आले. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काही खेपांचे पैसेही भारताने भूतानकडून घेतले नव्हते. याच लसींद्वारे भूतानमधील लोकांचे लसीकरण झाले. डोंगराळ भागात वसलेल्या या देशात भारताने मोफत लस पाठवल्याने तेथील नागरिकांना सुरक्षा कवच मिळाले. तेथील राजा आणि प्रशासक जिग्मे खेसर नामगयेल वांगचूक यांच्या नेतृत्वात प्रभावी लसीकरण राबवण्यात आली. बर्फाळ प्रदेश, गोठलेल्या नद्यांतूनही त्यांनी अत्यंत दुर्गम भागात लसीकरण केले. या सर्वांमुळे भूतान कोरोना संकटातून बहुतांश प्रमाणात सावरला आहे. या सहकार्यासाठी कृतज्ञता म्हणून भूतानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार यंदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे.

इतर बातम्या-

CBDC | आता भारताची स्वतःची डिजिटल करन्सी, CBDC चं रुपडं लवकरच लाँच होणार

“बलात्कार रोखता येत नाही त्यावेळी आनंद घ्यावा”, काँग्रेस आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य; अध्यक्षही हसत राहिले

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक