AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोल संदर्भात पुढच्या 15 दिवसांत मोठा निर्णय; गडकरी नेमकं काय म्हणाले?

पुढील पंधरा दिवसांमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील टोल संदर्भात एक नवीन पॉलिसी समोर येईल, अशी घोषणाही यावेळी नितीन गडकरी यांनी केली आहे.

टोल संदर्भात पुढच्या 15 दिवसांत मोठा निर्णय; गडकरी नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 14, 2025 | 8:03 PM
Share

या देशात पैशाची कमी नाही आहे, इमानदारीने देशाकरता काम करणारांची कमी आहे, मी संकल्प केला आहे की, दरवर्षी १० लाख कोटी रुपयांची कामं करायची, मला काही पैशांची कमी नाही, दोन लाख 80 हजार कोटी रुपये हे माझं बजेट आहे. आता तीन लाख कोटी झालं आहे, असं केंद्रीय परिवहन आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते  ७८ व्या वसंत व्याखानमालेमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले गडकरी? 

या देशात पैशाची कमी नाही आहे, इमानदारीने देशाकरता काम करणारांची कमी आहे, मी संकल्प केला आहे की, दरवर्षी १० लाख कोटी रुपयांची कामं करायची, मला काही पैशांची कमी नाही, दोन लाख 80 हजार कोटी रुपये हे माझं बजेट आहे. आता तीन लाख कोटी झालं आहे. पण माझा प्रश्न पैशाचा नाही आहे,  माझा प्रश्न एवढे पैसे खर्च का होत नाही हा माझा प्रश्न आहे. मुंबई गोवा रस्ता पूर्ण करताना खूप अडचणी आल्या, पण आता येणाऱ्या जूनपर्यंत हा रस्ता  १०० टक्के पूर्ण होईल, दिल्ली -जयपूर महामार्ग देखील अडचणीचा होता, असं यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढील पंधरा दिवसांमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील टोल संदर्भात एक नवीन पॉलिसी समोर येईल, अशी घोषणाही यावेळी नितीन गडकरी यांनी केली आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की,  आशियातली सगळ्यात मोठं भुयार झोजीला, तिथे आठ डिग्री तापमान आहे, ज्याचं बजेट १२ हजार कोटी होतं, मात्र आम्ही ५५०० कोटीमध्ये हा रस्ता करणार आहोत, सहा हजार रुपये वाचवले. जवळपास सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढच्या दोन वर्षांच्या आत इंडियन रोड इन्फ्रास्ट्रक्चर नॅशनल हायवे हे अमेरिकेपेक्षा चांगले होतील, असा विश्वास देतो या देशात पाण्याची कमी नाही पाण्याच्या नियोजनाची कमी आहे, असंही यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

Follow Us
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?