Bihar : मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल, युवा चेहऱ्याची कॅबिनेटमध्ये होणार एन्ट्री? भाजप आमदाराने सांगितली मनातली इच्छा
मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. मैथिली ठाकूर यांच्या विधानाने युवा चेहऱ्याची कॅबिनेटमध्ये होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बिहारच्या भाजप आमदार मैथिली ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. एका मुलाखतीत बिहारच्या राजकारणावर मोठं भाष्य केलं आहे. त्यांनी मंत्रिपदावर मोठं भाष्य केलं आहे. मी फक्त मंत्रिपदावर समाधान मान्य करणारी नसून मी खूप महत्वाकांक्षी आहे, असे वक्तव्य मैथिली ठाकूर यांनी केलं आहे. मैथिली ठाकूर यांच्या विधानाने बिहारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार का, यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर (Maithili Thakur) यांनी त्यांच्या राजकीय भविष्याविषयी भाष्य केलं. मंत्री होण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर भाजप आमदार म्हणाल्या, ‘मला आमदार होण्याची देखील इच्छा नव्हती. पण पक्ष मला जे काम देईल, ते मी पूर्ण करेन’. तर पुढे म्हणाल्या, मी खूप महत्वाकांक्षी असून मंत्रिपदावर समाधानी राहीन का? असा सवाल देखील मैथिली ठाकूर यांनी उपस्थित केला. मैथिली ठाकूर यांनी निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या ट्रोलिंगवरही भाष्य केलं. ठाकूर म्हणाल्या, ‘निवडणूक लढणे कधीच सोपे नसते. त्यात आजच्या युगात सोशल मीडियामुळे (Social Media) आणखी आव्हानात्मक बनलं आहे’. काही दिवसांपूर्वी मैथिली यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर त्यांनी बिहार आणि खाद्यसंस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. यामुळे मैथिली ठाकूर यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
भाष्य करताना संवेदनशीलता आणि समजूतदारपणा दाखवणे गरजेचे – मैथिली ठाकूर
तत्पूर्वी, मैथिली ठाकूर यांनी राणी पद्मावतीवर अभिनेत्री स्वरा भास्करने भाष्य केलं होतं. स्वरा भास्करच्या विधानावरही मैथिली ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या वक्तव्याने एक स्त्री म्हणून दु:ख झालं का, असा प्रश्न विचारल्यावर मैथिली यांनी म्हटलं की, भारतात विविध धर्म आणि श्रद्धांचा आदर केला जातो. त्यामुळे कोणत्याही विषयावर भाष्य करताना संवेदनशीलता आणि समजूतदारपणा दाखवणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटलं. कोणाच्याही वैयक्तिक श्रद्धा किंवा धर्माला दुखावणारी टिप्पणी करू नये, असे त्यांनी म्हटलं.
