AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election Result: बिहारमध्ये भाजप JDU शिवाय सरकार स्थापन करणार? वाचा नवीन समीकरण

Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आघाडी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. एनडीएचे 200 पेक्षा जास्त उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. तर भाजप सध्या 94 जागांवर आघाडीवर आहे त्यामुळे आता जेडीयूशिवाय सरकार स्थापन करण्याची संधी भाजपकडे आहे.

Bihar Election Result: बिहारमध्ये भाजप JDU शिवाय सरकार स्थापन करणार? वाचा नवीन समीकरण
Bihar Election Result
| Updated on: Nov 14, 2025 | 4:32 PM
Share

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यात भाजपप्रणित एनडीए आघाडी शानदार विजय मिळवताना दिसत आहे. या निकालात भाजप सध्या 94 जागांवर आघाडीवर आहे. तसेच एनडीएचे 200 पेक्षा जास्त उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. त्यामुळे आता बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत चर्चा रंगली आहे. नितीश कुमार यांचे नाव पुढे येत आहे. मात्र भाजपला JDU शिवाय सरकार स्थापन करण्याची संधी निर्माण झाली आहे. हे नवीन समीकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.

भाजप जेडीयूशिवाय सरकार स्थापन करणार?

भारतीय जनता पार्टी सध्या 94 जागांवर आघाडीवर आहे. आता भाजप नितीश कुमार यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करू शकते. जेडीयूशिवाय एनडीएचा बहुमताचा आकडा 122 वर पोहोचला आहे. भाजप 94 जागांवर, चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) 19 जागांवर, जीतन राम मांझी यांचा HUM 5 जागांवर आणि उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा 4 जागांवर आघाडीवर आहे. हा आकडा 122 आहे, जो बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे भाजप नितीश कुमार यांच्याशिवाय बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यास सक्षम आहे. मात्र आता पक्ष याबाबत काय निर्णय घेतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बिहाप विधानसभेत भाजप आणि जेडीयूने प्रत्येकी 101 जागा लढवल्या होत्या, ज्यामध्ये भाजप 94 जागांसह मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. तर जेडीयूचे उमेदवार 82 जागांवर आघाडीत आहे. जेडीयू दुसऱ्या स्थावावर असला तरी मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार हे दावा करण्याची शक्यता आहे. मात्र भाजपला मुख्यमंत्रीपद हवे असेल आणि नितीश कुमार यासाठी तयार नसल्यास भाजप जेडीयूशिवाय सत्ता स्थापन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

NDA कडून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची घोषणा नाही

बिहार निवडणुकीसाठी महाआघाडीने तेजस्वी यादव यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी घोषित केले होते, मात्र NDA कडून नितीश कुमार किंवा इतर कोणत्याही नेत्याच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषणा केली नव्हते. जेव्हा मुख्यमंत्री कोण होईल असा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा एनडीएने निवडणूक जिंकली तर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडला जाईल असं उत्तर भाजपच्या नेत्यांनी दिले होते. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..