AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनार बांगलाच्या नावाखाली जनेतशी छळ, ही निवडणूक म्हणजे…धर्मेंद्र प्रधान यांची तृणमूलवर सडकून टीका!

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली.

सोनार बांगलाच्या नावाखाली जनेतशी छळ, ही निवडणूक म्हणजे...धर्मेंद्र प्रधान यांची तृणमूलवर सडकून टीका!
dharmendra pradhanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2026 | 5:07 PM
Share

West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. या निवडणुकीमुळे तेथील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आपली सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या काळात पश्चिम बंगालमध्ये मोठे अराजक निर्माण झाले आहे, असा आरोप भाजपाकडून केला जातोय. काहीही झालं तरी यावेळी तेथे सत्तापालट करून भाजपाचा मुख्यमंत्री करण्यासाठी तेथे भाजपा पक्ष पूर्ण ताकदीने उतरला आहे. बंगालच्या निवडणुकीत राष्ट्रीय नेत्यांनीही लक्ष घातले आहे. दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आक्रमक होत पश्चिम बंगालमधील सध्या सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसवर सडकून टीका केली. बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये अराजकता निर्माण झाली आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

राजकीय हिंसा, घुसखोरी यांना…

“पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून भ्रष्टाचार, लांगुलचालन, राजकीय हिंसा, घुसखोरी यांना संरक्षण देणारे सरकार कार्यरत आहे. हिंसा, घुसखोरी, लांगुलचालन तेथे राजकीय व्यवस्थेचा भाग झाले आहे. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वातील सरकार हे अविश्वास, अराजकता, भय याचे दुसरे रुप झाले आहे. जनतेचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे,” असा हल्लाोबल धर्मेंद्र प्रधान यांनी केला.

सरकारच्या ढिसाळ धोरणामुळे…

तसेच, पश्चिम बंगालमधील विधानसभेची निवडणूक ही फक्त सत्ता परिवर्तनाचा भाग नाीही, तर ही निवडणूक म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा झाली आहे. पश्चिम बंगालच्या सीमा या देशाच्या सुरक्षेशी निगडित आहेत. पश्चिम बंगालमधील सरकारच्या ढिसाळ धोरणामुळे हा विषय जास्तच गंभीर झाला आहे. ‘सोनार बांग्ला’च्या नावाखाली सिंडिकेट, भ्रष्टाचार, लाचखोरी यासारख्या कुशासनाच्या माध्यमातून लोकांना छळले जात आहे, अशीही टीका त्यांनी केली.

तृणमूल काँग्रेसच्या सत्तेमुळे पश्चिम बंगाल खूप…

पश्चिम बंगालमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांत वाढ होत आहे. युवक बेरोजगार युवक, हतबल शेतकरी, कोडमडलेली आरोग्य व्यवस्ता, घसरत चाललेला साक्षरता दर तसेच प्रत्येक क्षेत्रातील अपयश हीच बंगालची ओळख होत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सत्तेमुळे पश्चिम बंगाल खूप मागे गेला आहे, असेही मत त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये व्यक्त केले.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....