AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्णव गोस्वामी अटक प्रकरण : भाजप नेत्याचे थेट सरन्यायाधीशांना पत्र; मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावा

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केल्यानंतर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी अर्णव गोस्वामी यांच्या अटक प्रकरणात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावा केला आहे.

अर्णव गोस्वामी अटक प्रकरण : भाजप नेत्याचे थेट सरन्यायाधीशांना पत्र; मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावा
| Updated on: Nov 09, 2020 | 11:33 PM
Share

नवी दिल्ली : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केल्यानंतर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया (BJP national spokesperson Gaurav Bhatia ) यांनी अर्णव गोस्वामी यांच्या अटक प्रकरणात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावा केला आहे. भाटीया यांनी याबाबत थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शऱद बोबडे यांना पत्र लिहिले आहे. (BJP national spokesperson Gaurav Bhatia claimed that arrest of Arnav Goswami is violation of human rights)

“महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना केलेली अटक ही पूर्णपणे असंवैधानिक आहे. ही अटक अवैध तर आहेच; पण त्याच बरोबर यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचेही दिसत आहे. रिपब्लिक मीडिया आणि त्याचे संपादक अर्णव गोस्वामी यांना लक्ष्य केलं जातंय. तसेच त्यांनी अपमानीतही करण्यात येतंय. अर्णव यांनी पालघर साधू हत्या, सुशांतसिंह राजपूत आतम्हत्या प्रकरण तसेच अन्य प्रकरणात महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारल्यामुळे त्यांना ही शिक्षा दिली जात आहे.” असं गौरव भाटिया यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

त्याचबरोबर भाटिया यांनी, अर्णव गोस्वामी यांना अटक म्हणजे भारतीय लोकशाहीच्या चौथ्या खांबावर थेट प्रहार आहे, असंही सरन्याधीशांना सांगितलं. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद बोलवून रिपब्लिक टीव्हीवर टीआरपी घोटाळा केल्याचा खोटा आरोप केला. बंद करण्यात आलेल्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु करुन गोस्वामी यांना 4 नोव्हेंबर 2020 च्या सकाळी अटक केली. ही सर्व उदाहरणं सत्तेच्या दुरुपयोगाची आहे, असंही भाटिया म्हणाले.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालायने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना सत्र न्यायालयातूनही दिलासा मिळाला नाही. अर्णव यांना पोलीस कोठडी देण्याच्या पोलिसांच्या याचिकेवर सोमवारी (9 नोव्हेंबर) युक्तिवाद झाला. त्यामुळे अर्णव यांच्या जामिनाच्या अर्जावर आज कामकाज होऊ शकले नाही. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याने अर्णव यांना आजची रात्रही तळोजा तुरुंगात काढावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

हायकोर्टाने स्वत: दखल घ्यावी, अर्णव गोस्वामींच्या धक्काबुक्कीची चौकशी करावी : देवेंद्र फडणवीस

अर्णव गोस्वामींच्या जीवाला धोका असल्यामुळे राज्यपालांना गृहमंत्र्यांशी बोलावे लागले: राम कदम

राज्यपालांनी अर्णव गोस्वामींची चिंता करु नये, सरकार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतेय: भुजबळ

(BJP national spokesperson Gaurav Bhatia claimed that arrest of Arnav Goswami is violation of human rights)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?