AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी थकतही नाही, झोपतही नाही…भाजपने आपल्या घटनेत बदल करावा, कोणी दिला सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थकतही नाही, झोपतही नाही. देशासाठी संपूर्ण निष्ठेने काम करतात. त्यांना देशसेवा करण्याची आणखी संधी दिली पाहिजे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या घटनेत बदल केला पाहिजे. निवृत्तीचे वय वाढवले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी थकतही नाही, झोपतही नाही...भाजपने आपल्या घटनेत बदल करावा, कोणी दिला सल्ला
Narendra ModiImage Credit source: Instagram
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 31, 2025 | 8:43 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात निरंजनी अखाडाचे महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी जी महाराज यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याची आणि नेतृत्वाची गरज आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाने आपल्या घटनेत बदल केला पाहिजे. भाजपने नेत्यांच्या निवृत्तीचे वय 75 वरुन वाढवून 85 वर्ष केले पाहिजे, असे कैलाशानंद गिरी जी महाराज यांनी म्हटले आहे.

महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी जी जमुई जिल्ह्यातील सिमुलतला येथील आश्रमात पोहचले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी जवळून ओळखतो. ते थकतही नाही, झोपतही नाही. देशासाठी संपूर्ण निष्ठेने काम करतात. त्यांना देशसेवा करण्याची आणखी संधी दिली पाहिजे. पीएम नरेंद्र मोदी यांची देशाला गरज आहे.

चीनच्या प्रभावावर चिंता

महामंडलेश्वर यांनी नेपाळमध्ये चीनचा वाढत असलेल्या प्रभावावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, भारताने नेपाळच्या संरक्षणासाठी पाऊले उचलली पाहिजे. मी 12 दिवसांचा नेपाळ प्रवास करुन आता परत आलो आहे. त्या ठिकाणी 85 टक्के हिन्दू आहेत. नेपाळ एक ‘हिंदू राष्ट्र’ आहे. भारताने नेपाळचे संरक्षण केले पाहिजे. त्या ठिकाणी चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी पाऊले उचलली पाहिजे. नेपाळ आमचा लहान भाऊ आहे. तो आमचापासून वेगळा झाला तर आमचे खूप नुकसान होईल. त्यामुळे नेपाळला चीनच्या प्रभावापासून वाचवले पाहिजे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे बंद केले नाही तर पाकिस्तानवर पुन्हा मोठी कारवाई केली पाहिजे. भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगभरातील देशांचे ऐकून पाकिस्तानवर दया दाखवली. पण तो देश दया करण्याचा लाईकीचा नाही.

कैलाशानंद गिरी यांनी म्हटले, भारत सनातनांचा देश आहे. यामुळे भारताला हिंदू राष्ट्र जाहीर केले पाहिजे. जो भारतात राहतो त्याला ‘वंदे मातरम्’ म्हणावेच लागणार आहे. भगवा ध्वजास नाही पण राष्ट्रध्वजास तुम्हाला नमन करावेच लागणार आहे. भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला ‘वंदे भारत’ आणि ‘भारत माता की जय’ म्हणावे लागणार आहे.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?