AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना चमक-धमक, ना आलिशान महाल.. असं दिसतं 7 कोटींमध्ये ‘रामायण’ बनवणाऱ्या रामानंद सागर यांचं घर

रामानंद सागर यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत साधं होतं. ते दिखाऊपणाला फार महत्त्व देणारे नव्हते. 2005 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतरही 'सागर व्हिला' त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचा राहिला आहे. त्यांचा मुलगा प्रेम सागर हे आजही तिथेच राहतात.

| Updated on: Aug 02, 2026 | 1:31 PM
Share
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. तर दुसरीकडे यामुळे रामानंद सागर यांची 'रामायण' ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 1987 मध्ये जेव्हा दूरदर्शनवर ही मालिका प्रसारित व्हायची, तेव्हा संपूर्ण देश टीव्हीसमोर बसायचा.

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. तर दुसरीकडे यामुळे रामानंद सागर यांची 'रामायण' ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 1987 मध्ये जेव्हा दूरदर्शनवर ही मालिका प्रसारित व्हायची, तेव्हा संपूर्ण देश टीव्हीसमोर बसायचा.

1 / 5
39 वर्षांपूर्वी रामानंद सागर यांनी 'रामायण' ही मालिका जवळपास 7 ते 9 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवली होती. आजकाल तर चित्रपटातील एका सीनवरच इतके पैसे खर्च होतात. इतक्या मोठ्या कलाकृतीची निर्मिती करणाऱ्या रामानंद सागर यांचा बंगला कसा दिसतो, हे तुम्हाला माहीत आहे का?

39 वर्षांपूर्वी रामानंद सागर यांनी 'रामायण' ही मालिका जवळपास 7 ते 9 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवली होती. आजकाल तर चित्रपटातील एका सीनवरच इतके पैसे खर्च होतात. इतक्या मोठ्या कलाकृतीची निर्मिती करणाऱ्या रामानंद सागर यांचा बंगला कसा दिसतो, हे तुम्हाला माहीत आहे का?

2 / 5
सामान्य दिसणारे रामानंद सागर यांचं घरसुद्धा अत्यंत सर्वसाधारण आहे. ते मुंबईतील जुहू परिसरात राहायचे. 'सागर व्हिला' नावाने त्यांचं हे घर आहे. एनएस रोड नंबर 11 वरील हे घर खूपच सामान्य आहे. रामानंद सागर आज हयात नसले तर त्यांचे कुटुंबीय याच घराच राहतात.

सामान्य दिसणारे रामानंद सागर यांचं घरसुद्धा अत्यंत सर्वसाधारण आहे. ते मुंबईतील जुहू परिसरात राहायचे. 'सागर व्हिला' नावाने त्यांचं हे घर आहे. एनएस रोड नंबर 11 वरील हे घर खूपच सामान्य आहे. रामानंद सागर आज हयात नसले तर त्यांचे कुटुंबीय याच घराच राहतात.

3 / 5
आजकाल मोठमोठ्या कलाकारांचं आणि दिग्दर्शकांचं घर अत्यंत आलिशान असल्याचं पहायला मिळत. परंतु 'सागर व्हिला'चं इंटेरिअरसुद्धा सर्वसामान्य आहे. बाहेरून हा बंगला अत्यंत शांत आणि प्रतिष्ठित असं दिसतं. रामानंद सागर यांनी रामायण, श्रीकृष्ण, विक्रम वेताळ यांसारख्या मालिकांच्या कथा लिहिल्या आहेत.

आजकाल मोठमोठ्या कलाकारांचं आणि दिग्दर्शकांचं घर अत्यंत आलिशान असल्याचं पहायला मिळत. परंतु 'सागर व्हिला'चं इंटेरिअरसुद्धा सर्वसामान्य आहे. बाहेरून हा बंगला अत्यंत शांत आणि प्रतिष्ठित असं दिसतं. रामानंद सागर यांनी रामायण, श्रीकृष्ण, विक्रम वेताळ यांसारख्या मालिकांच्या कथा लिहिल्या आहेत.

4 / 5
इतकंच नव्हे तर बजेटच्या कमतरतेमुळे काही मालिकांचं शूटिंगसुद्धा याच घरात करण्यात आलं होतं. म्हणजेच रामानंद सागर यांचं हे घर फक्त राहण्याचं ठिकाण नसून भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. 'विक्रम और बेताल' या मालिकेचं चित्रीकरण याच 'सागर व्हिला'मध्ये झालं होतं.

इतकंच नव्हे तर बजेटच्या कमतरतेमुळे काही मालिकांचं शूटिंगसुद्धा याच घरात करण्यात आलं होतं. म्हणजेच रामानंद सागर यांचं हे घर फक्त राहण्याचं ठिकाण नसून भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. 'विक्रम और बेताल' या मालिकेचं चित्रीकरण याच 'सागर व्हिला'मध्ये झालं होतं.

5 / 5
Follow Us
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...