AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना आता कार्यालयातून काम करावं लागणार, सरकारचा नवा आदेश

कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता कामाच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना आता कार्यालयातून काम करावं लागणार, सरकारचा नवा आदेश
| Updated on: Feb 14, 2021 | 10:28 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना आता कामाच्या दिवशी कार्यालयात जावण लागणार आहे. कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता कामाच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीसह सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.(Central government employees will now have to work from the office)

दरम्यान कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट दिली जाणार, असल्याची माहितीही कार्मिक मंत्रालयानं दिली आहे. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झोन डी-नोटीफाईड होत नाही तोपर्यंत त्यांना कार्यालयात येण्यापासून सूट दिली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कार्यालयांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नवा SOP जारी केला आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात उपस्थित राहून काम करावं लागणार आहे.

निर्जंतुकीकरणानंतर पुन्हा कामाला सुरुवात

जर एखाद्या कार्यालयात कोरोना संसर्गाचे 1 किंवा 2 प्रकरणं समोर आली तर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया फक्त त्या जागेपुरती किंवा परिसरापुरती मर्यादित असेल. कोरोना रुग्ण गेल्या 48 तासांत ज्या परिसरात काम करत होता किंवा ज्या परिसरात गेला होता, त्या परिसराचं निर्जंतुकीकरण केलं जाईल. त्यानंतर त्या कार्यालयात पुन्हा कामकाजाला सुरुवात केली जाणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं रविवारी सांगितल्यानुसार भारतात 1 ऑक्टोबर 2020 पासून सातत्याने कोरोना मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट होत आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत भारतात जास्ती आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्मिक मंत्रालयानं दिली आहे.

यापूर्वी केंद्र सरकारने मे 2020 मध्ये उपसचिव स्तराखालील 50 टक्के कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयातून काम करण्यास सांगितलं होतं. आता अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीनंतर विभागाच्या प्रमुखांनी निश्चित केलेल्या कार्यालयातील गर्दीपासून वाचण्यासाठी वेळेचं पालन केलं जाणार आहे.

संबंधित बातम्या :

चिंताजनक..हिंगणघाटच्या ‘त्या’ शाळेतील कोरोनाबाधितांची शंभरी पार, अँटिजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह 23 जण RTPCRमध्ये पॉझिटिव्ह

नागपुरात वाढता कोरोनाचा संसर्ग, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Central government employees will now have to work from the office

Follow Us
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.