AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! देशातील महत्त्वाच्या राज्याचं थेट नाव बदललं, नवं नाव काय? जाणून घ्या

केंद्र सरकारने एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आता सर्वच शासकीय कादपत्रांत या राज्याचे नाव बदलले जाणार आहे.

मोठी बातमी! देशातील महत्त्वाच्या राज्याचं थेट नाव बदललं, नवं नाव काय? जाणून घ्या
narendra modiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 24, 2026 | 5:26 PM
Share

केंद्रात जेव्हापासून एनडीएचे सरकार आलेले आहे, तेव्हापासून अनेक राज्यांत शहरांची नावे बदलण्यात आलेली आहेत. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेवर काही लोकांनी सडकून टीकादेखील केलेली आहे. दरम्यान, आता केंद्र सरकारने देशातील एका राज्याचेच थेट नाव बदलण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने या मागणीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे आता भविष्यात या राज्याला त्याच्या नव्या नावानेच ओळखावे लागणार आहे.

राज्य कोणते, नवे नाव काय असेल?

मिळालेल्या माहितीनुसार केरळ राज्याचे नाव बदलले जाणार आहे. केंद्र सरकारने मंगळवारी या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. काही दिवसांपूर्वी केरळमधील राज्य सरकारकडून तसा प्रस्ताव आला होता. या प्रस्तावावर विचार करून केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार आता केरळचे नाव केरळम केले जाणार आहे. येत्या एप्रिल, मे महिन्यात केरळमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता केरळचे नाव केरळम करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे.

दोन वेला पाठवला होता प्रस्ताव

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तशी माहिती दिली आहे. केरळच्या विधानसभेत 24 जून 2024 रोजी सर्वसहमतीने केरळ राज्याचे नाव बदलून ते केरळम करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव नंतर केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. याच प्रस्तावावर आता निर्णय घेण्यात आला आहे. याआधीदेखील 2023 साली केरळच्या राज्य सरकारने असाच एक प्रस्ताव पाठवला होता. त्यावेळी केंद्र सरकारने या प्रस्तावाचा अभ्यास करून प्रस्तावात काही तांत्रिक बदल सुचवले होते.

विधानसभेच्या तोंडावर प्रस्तावाला मंजुरी, फायदा होणार

आता केरळचे नाव केरळम असे केले जाणार आहे. भारतीय संविधानातील 8 व्या अनुसूचिमध्ये केरळ राज्याच्या नावात केरळम असा बदल केला जाणार आहे. दरम्यान, केरळमध्ये विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना केंद्र सरकारने राज्याचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे त्या राज्यात भाजपाला तसेच मित्रपक्षांना काही फायदा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचाच हक्क आदित्य ठाकरेंचा दावा
राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचाच हक्क आदित्य ठाकरेंचा दावा.
अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप
अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप.
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार.
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका.
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?.
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन.
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह.
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंचा एकाच लिफ्टमधून प्रवास!
मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंचा एकाच लिफ्टमधून प्रवास!.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करा! वडेट्टीवार यांची मागणी
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करा! वडेट्टीवार यांची मागणी.