AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhattisgarh Naxal Attack : नक्षलवादी हल्ल्यानंतर अमित शाहांची उच्च स्तरीय बैठक, शहीदांचा आकडा 22 वर

वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शाह यांच्या निवासस्थानी उच्च स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला गृहसचिव अजय भल्ला, IBचे डायरेक्टर अरविंद कुमार, वरिष्ठ सीआरपीएफ अधिकारीही उपस्थित होते.

Chhattisgarh Naxal Attack : नक्षलवादी हल्ल्यानंतर अमित शाहांची उच्च स्तरीय बैठक, शहीदांचा आकडा 22 वर
नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
| Updated on: Apr 04, 2021 | 9:04 PM
Share

नवी दिल्ली : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे 22 जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे देशात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या आसाम दौरा अर्धवट सोडून राजधानी दिल्ली गाठली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शाह यांच्या निवासस्थानी उच्च स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला गृहसचिव अजय भल्ला, IBचे डायरेक्टर अरविंद कुमार, वरिष्ठ सीआरपीएफ अधिकारीही उपस्थित होते. (Amit Shah taking top-level meeting with senior officers on Bijapur encounter at his residence)

नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई होणार?

मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत MHA आणि CRPF चे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर स्पेशल डीजी संजय चंदरही उपस्थित होते, असं सांगण्यात येत आहे. या बैठकीत नक्षलवाद्यांविरोधात एका मोठ्या कारवाईची रणनिती ठरण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर सध्या या प्रकरणाचा तपास NIAकडे सोपवला जाईल, असंही सांगण्यात येतंय.

शहीद जवानांची संख्या 22 वर

गृहमंत्री अमित शाह आज आसाम विधानसभा निवडणूक प्रचारासाठी गेले होते. तिथे त्यांच्या 3 प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रचार रॅली केल्यानंतरच अमित शाह यांनी दिल्ली गाठली. छत्तीसगडमध्ये बीजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शनिवारी सुरक्षा दलाचे 5 जवान शहीद झाले होते. तर 30 जवान जखमी होते. पोलिसांनी सांगितलं की चकमकीनंतर बेपत्ता झालेल्या 18 जवानांपैकी 17 जवानांचे मृतदेह आज आढळून आले. त्यामुळे नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांची संख्या 22 झाली आहे.

25 ते 30 नक्षलवाद्यांचाही खात्मा- सीआरपीएफ

बीजापूरमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 25 ते 30 नक्षलवादी ठार झाल्याचा दावा CRPFचे DG कुलदीप सिंह यांनी केलाय. त्याचबरोबर ही कारवाई म्हणजे कुठलं ऑपरेशनल किंवा गुप्तचर विभागाचं अपयश नसल्याचंही सिंह म्हणालेत. जर या कारवाईत काही ऑपरेशनल अपयश असेल तर एवढ्या मोठ्या संख्येत नक्षलवादी मारले गेले नसते, असंही सिंह यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या : 

Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यानंतर अमित शाहांचा आसाम दौरा रद्द

Sukma Naxal attack: 250 नक्षलवाद्यांचा हल्ला, 22 जवान शहीद, पाच तास चकमक, छत्तीसगडमध्ये नेमकं काय घडलं?

Amit Shah taking top-level meeting with senior officers on Bijapur encounter at his residence

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.