AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोलकाताच्या हावडामध्ये रामनवमीच्या यात्रेदरम्यान जे नको व्हायला होतं तेच घडलं, अनपेक्षित प्रकार

राम नवमीच्या दिवशी आज जे घडायला नको होतं तेच कोलकाताच्या हावडा येथे घडलं आहे. राम नवमीच्या यात्रेदरम्यान मोठा वाद उफाळल्याची माहिती समोर आलीय. या वादातून परिसरातील गाड्यांची जाळपोळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कोलकाताच्या हावडामध्ये रामनवमीच्या यात्रेदरम्यान जे नको व्हायला होतं तेच घडलं, अनपेक्षित प्रकार
| Edited By: | Updated on: Mar 30, 2023 | 7:00 PM
Share

कोलकाता : देशभरात श्रीराम नवमीच्या (Ran Navami) उत्साहादरम्यान काही अनपेक्षित घटना समोर येत आहेत. श्रीराम हे त्यागाचे प्रतिक मानले जातात. त्यांनी शांततेचा संदेश दिला. त्यांनी न्यायाला महत्त्व दिलं. आपल्या प्रजेसाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. एक मुलगा म्हणून आपण कसं असावं, एक धनुर्धारी योद्धा म्हणून कसं असावं, एक राजा म्हणून कसं असावं, एक माणूस म्हणून कसं असावं हे श्रीरामांचं चरित्र वाचल्यावर समजतं. पण आज रामजयंतीच्या दिवशीच काही अनपेक्षित अशा घटना समोर येत आहेत. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरात दोन गटातील वाद विकोपाला गेल्याची बातमी ताजी असताना पश्चिम बंगालमधूनही अशीच अनपेक्षित घटना समोर आली आहे.

कोलकाताच्या हावडामध्ये रामनवमीच्या यात्रेदरम्यान दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. हावडामध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. हावडामधील शिवपुरी भागात ही तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. सध्या तरी परिसरात तणावपूर्ण शांतता दिसत आहे.

रामनवमीच्या निमित्ताने हावडामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत घोषणाबाजी करण्यावरुन वाद निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. या वादातून परिसरातील जाळपोळ करण्यात आली. अनेक गाड्या जाळण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून गाड्यांना लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. पोलिसांनी वादावर आता नियंत्रण मिळवल्याची देखील माहिती समोर आली आहे.

गुजरातच्या फतेहपुरात शोभायात्रेवर दगडफेक

दुसरीकडे गुजरातच्या फतेहपुरातही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. फतेहपुरात रामनवमीच्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शोभायात्रेत सहभागी असलेले काही भाविक आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले.  यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा अंदाज पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी लगेच गदारोळावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.

पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केल्यानंतर दगडफेक करणारे समाजकंटक परिसरातून पळून गेले. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता बघायला मिळाली. दरम्यान, या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांकडून पुन्हा तसा काही प्रकार घडणार नाही यासाठी काळजी घेतली जात आहे. तसेच दगडफेक प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.