AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, भाजप विरोधात एकत्र या, mamata banerjee यांचा एल्गार, पवारांसह गैरभाजप मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्रं

देशभरात गैरभाजपा शासित राज्यांमध्ये तपास यंत्रणांच्या कारवाया वाढल्याने विरोधी पक्षांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह गैरभाजपाशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं आहे.

तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, भाजप विरोधात एकत्र या, mamata banerjee यांचा एल्गार, पवारांसह गैरभाजप मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्रं
तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, भाजप विरोधात एकत्र या, mamata banerjee यांचा एल्गारImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 29, 2022 | 1:53 PM
Share

नवी दिल्ली: देशभरात गैरभाजपा (bjp) शासित राज्यांमध्ये तपास यंत्रणांच्या कारवाया वाढल्याने विरोधी पक्षांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (cm mamata banerjee) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यासह गैरभाजपाशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे भाजपविरोधात एकत्र या, असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी या पत्रातून केलं आहे. देशात सूडाचं राजकारण सुरू आहे. त्यानुसार ईडी, सीबीआय, आयबी, इन्कम टॅक्ससह विविध यंत्रणांचा राजकीय वापरासाठी चुकीचा वापर होत आहे, असं सांगत या प्रकारावर ममता बॅनर्जी यांनी चिंताही व्यक्त केली आहे. तसेच या मुद्द्यावर विरोधी पक्षांची एक बैठक होण्याची गरज आहे. या बैठकीतल पुढील वाटचाल आणि रणनीतीवर चर्चा केली गेली पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीचे संकेत मिळताना दिसत आहेत.

ममता बॅनर्जी यांनी 27 मार्च रोजी हे पत्रं लिहिलं आहे. मात्र तृणमूल काँग्रेसने आज हे पत्रं मीडियासमोर आणलं. या पत्रातून तपास यंत्रणाचा होणाऱ्या गैरवापरावर चिंता व्यक्त करतानाच हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. भाजपच्या हुकूमशाही सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. त्यामुळे या मुद्द्यावर लवकरच एक बैठक बोलवून त्यात पुढील रणनीती आखली पाहिजे, असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

मुंबई किंवा दिल्लीत बैठक

ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही पत्रं लिहिलं आहे. पवारांनीही ममता बॅनर्जी यांचं पत्रं मिळाल्याचं स्पष्ट केलं आहे. या पत्रानंतर आम्ही लवकरच एक बैठक घेणार आहोत. ही बैठक दिल्ली किंवा मुंबई दोन्हीपैकी एका ठिकाणी होईल. बैठकीची तारीख अजून निश्चित नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत.

तपास यंत्रणांकडून चौकशी

कोळसा घोटाळा आणि पशू तस्करी प्रकरणात ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची सीबीआय आणि ईडीने चौकशी केली आहे. त्यामुळे ममतादीदींच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्रातही गैर भाजप पक्षातील नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरू आहेत. त्यापार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

संबंधित बातम्या:

Bengal: पश्चिम बंगालच्या विधानसभेत राडा, एकमेकांना मारहाण, कपडेही फाडले, आमदार रुग्णालयात, नेमकं काय घडलं?

VIDEO: पवारांनी काय केलं ते सोडा, सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली?; अमोल मिटकरींची खोचक टीका

S. Y. Quraishi | सुशिक्षित हिंदू मुली मुस्लिम मुलांना नेतात, माजी निवडणूक आयुक्तांच्या वक्तव्याची चर्चा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.