AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फेसबुकच्या द्वेषपूर्ण पोस्ट प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा’, काँग्रेसचं थेट मार्क झुकरबर्गला पत्र

काँग्रेसने थेट फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून द्वेषपूर्ण पोस्ट प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे (Congress demand high level inquiry of Facebook).

'फेसबुकच्या द्वेषपूर्ण पोस्ट प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा', काँग्रेसचं थेट मार्क झुकरबर्गला पत्र
| Updated on: Aug 18, 2020 | 7:35 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेसने थेट फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनाच पत्र लिहून भाजप नेत्यांच्या द्वेषपूर्ण पोस्टवर कारवाई न करण्याच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे (Congress demand high level inquiry of Facebook). दुसरीकडे काँग्रेसने भारतात संसदीय समितीकडून या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्याचीही मागणी केली. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी मार्क झुकरबर्ग यांना ईमेलद्वारे पत्र लिहून काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. तसेच फेसबुकने आपल्या स्तरावर देखील याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

के. सी. वेणुगोप यांनी मार्क झुकरबर्ग यांच्याकडे फेसबुक इंडियाबाबत अनेक आक्षेप नोंदवले आहेत. तसेच या प्रकरणाची फेसबुकच्या मुख्यालयाकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. तसेच चौकशी होऊपर्यंत फेसबुक इंडियाची जबाबदारी आरोपी अधिकाऱ्यांकडून काढून नव्या टीमकडे देण्याचीही मागणी केली. आरोपी अधिकाऱ्यांकडून चौकशी प्रभावित होऊ नये, यासाठी अशी मागणी केल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा : ‘हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाई नाही’, WSJ च्या अहवालात Facebook वर गंभीर आरोप

राहुल गांधी म्हणाले, “भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर भाजप आणि आरएसएस यांचं नियंत्रण आहे. या माध्यमातून ते खोट्या आणि द्वेषपूर्ण पोस्ट पसरवून मतदारांची दिशाभूल करतात. अखेर अमेरिकेतील माध्यमांनी फेसबुकचा खरा चेहरा समोर आणला आहे.”

“आम्ही पक्षपातीपणा, खोट्या बातम्या आणि द्वेषपूर्ण गोष्टींना कठोर संघर्षांतून मिळवलेल्या लोकशाहीसोबत खेळू देणार नाही. फेसबुक या प्रकारच्या खोट्या आणि द्वेषपूर्ण बातम्या पसरवण्याचं काम करत असल्याचं डब्ल्यूएसजेने समोर आणलं आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी फेसबुकच्या या कृतीवर प्रश्न उपस्थित करायला हवे,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

संबंधित बातम्या :

Apple, Amazon, Facebook, Google च्या प्रमुखांवर गंभीर आरोप, अमेरिकेच्या संसदेत सर्वांची झाडाझडती

फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा दंड

एकट्या भाजपकडून सोशल मीडियावरील जाहिरातींवर 25 कोटींचा खर्च, इतर पक्षांकडून किती?

Congress demand high level inquiry of Facebook

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.