AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संध्याकाळची मुदत, त्या आमदारांसाठी इंडिया आघाडीचा ‘प्लॅन बी’? भाजपमध्ये बैठकांची फेरी सुरू,

झामुमोच्या आमदारांनी राज्यपाल यांच्याकडे लवकर सरकार स्थापन करावे अशी मागणी केली. परंतु, जेएमएमला अद्याप राज्यपालांकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळालेले नाही. जेएमएम नेतृत्वाखालील आघाडीला 1 फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळाले नाही तर..

संध्याकाळची मुदत, त्या आमदारांसाठी इंडिया आघाडीचा 'प्लॅन बी'? भाजपमध्ये बैठकांची फेरी सुरू,
CM HEMANT SORENImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Feb 01, 2024 | 2:54 PM
Share

झारखंड | 1 फेब्रुवारी 2024 : झारखंडमध्ये बुधवारी राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडी अधिकाऱ्यांसह राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. तर, संध्याकाळी विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी 43 आमदारांचे समर्थन पत्र राज्यपाल यांना सादर केले. चंपाई सोरेन यांनी या पत्रामधून सरकार स्थापनेचा दावा केला. यादरम्यान भाजपही सक्रिय झाली आहे. भाजपमध्ये अंतर्गत बैठकांची फेरी सुरू झाली आहे. तर, संध्याकाळपर्यंत राजभवनातून सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळाले नाही तर झारखंड मुक्ती मोर्चाने ‘प्लॅन बी’ही तयार ठेवला आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला. त्याचवेळी झारखंड मुक्ती मोर्चाच्या (जेएमएम) नेतृत्वाखालील सत्ताधारी इंडिया आघाडीने चंपाई सोरेन यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली. विधीमंडळ पक्ष नेते चंपाई सोरेन यांनी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला.

झामुमोच्या आमदारांनी राज्यपाल यांच्याकडे लवकर सरकार स्थापन करावे अशी मागणी केली. परंतु, जेएमएमला अद्याप राज्यपालांकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळालेले नाही. जेएमएम नेतृत्वाखालील आघाडीला 1 फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळाले नाही तर आघाडीच्या आमदारांना झारखंड बाहेर अन्य राज्यात हलवले जाण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

झारखंड विधानसभेमध्ये 80 सदस्य आहेत. त्यातील सत्ताधारी आघाडीकडे 48 आमदारांचे संख्याबळ आहे. तर, भाजप आघाडीकडे संख्याबळ सध्या 32 इतके आहे. परंतु, विधीमंडळ नेते चंपाई सोरेन यांनी राज्यपालांना दिलेल्या सरकार स्थापनेच्या पत्रावर केवळ 43 आमदारांच्या सह्या आहेत. हेमंत सोरेन यांना अटकेमुळे आणि भाजप सक्रिय झाल्यामुळे भारत आघाडीच्या नेत्यांना चिंतेत टाकले आहे. यामुळेच कोणत्याही प्रकारचा धोका टाळण्यासाठी भारत आघाडी सक्रिय झाली आहे.

भारत आघाडीमधील आमदार फुटू नयेत यासाठी या सर्व आमदारांना तेलंगणात हलविण्याची तयारी करण्यात येत आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार आहे. अशावेळी आमदारांचे ऐक्य कायम राहावे यासाठी तेलंगणा हे सर्वात सुरक्षित ठिकाण ठरू शकते, असे भारतीय आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच हे पाऊल उचलण्यात आले आहे.

दरम्यान, झारखंड भाजपही सत्ता स्थापनेसाठी सक्रीय झाली आहे. पक्षाचे राज्य प्रभारी लक्ष्मीकांत वाजपेयी हे राजधानी रांचीला पोहोचले आहेत. भाजप सक्रिय झाल्याचे झामुमो आणि काँग्रेससह भारतीय आघाडीतील इतर पक्षही अधिक सतर्क झाले आहेत.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण