AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ही’ निवडणूक दोघा भावांमध्ये होणार; भांडण नाही मत मांडणार…

काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक ही अंतर्गत आहे, त्यामुळे एका घरातील दोन भावांची ज्या प्रमाणे ही लढत आहे, तशीच होणार आहे.

'ही' निवडणूक दोघा भावांमध्ये होणार; भांडण नाही मत मांडणार...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Oct 09, 2022 | 6:53 PM
Share

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (Congress President Election 2022) काही दिवसच उरलेले आहेत, त्यामुळे आता निवडणुकीसाठी उभा राहिलेल्या उमेदवारांनी आपापली जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यामध्ये लढत होत आहे. काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीविषयी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पक्षाच्या अध्यक्षपदासाठी शशी थरूर यांच्याशी लढत असली तरी ती पक्षासाठी आहे. आणि ही लढत असताना आपले विचार मांडणे गरजेचे आहे असंही ते म्हणाले.

मल्लिकार्जुन खरगे यांनी येथील काँग्रेस कार्यालयामध्ये पक्षाच्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधताना त्यांनी सांगितले की, काँग्रेससाठी मी पक्षातील नेत्यांचा पाठिंबा मागितला आहे. त्यामुळे वाद वगैरे आमच्यामध्ये नसल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक ही अंतर्गत आहे, त्यामुळे एका घरातील दोन भावांची ज्या प्रमाणे ही लढत आहे, तशीच होणार आहे.

आम्ही भांडत नाही तर मांडणी करत आहोत असंही त्यांनी यावेळी बोलताना आपले मत मांडले. या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कांग्रेस अध्यक्ष पदासाठी मी निवडणूक लढवत आहे ते एकाच कारणासाठी ते म्हणजे मी पक्षासाठी काय करु शकतो. त्यामुळे पक्षाध्यक्ष झाल्यानंतर मी देशासाठी आणि पक्षासाठी आपण एकत्रित काय करणार यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे सांगितले.

याबरोबर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आज देशात एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाल्याने ते वातावरण बिघडत आहे.

त्यामुळे देशातील शांतता आणि एकता बळकट करण्याची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. या सगळ्यासाठी भारत जोडो यात्रा काढण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षपदी निवड झाल्यास पक्षाचा उदयपूर जाहीरनामा राबवणार असल्याचे सांगत, काँग्रेसला जर बळकट आणि मजबूत बनवायचे असेल तर आगामी काळात राहुल गांधींशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधींविषयी बोलताना म्हणाले की, आपण सोनिया गांधींना भेटून विनंती केली आहे की, जर काँग्रेसला मजबूत करायचे असेल, पक्षाला शक्तीशाली बनवायचे असेल तर राहुल गांधींशिवाय पर्याय नाही.

कारण संसदेपासून ते अगदी रस्त्यावरची लढई लढण्यापर्यंत राहुल गांधी यांच्यासारखा लढवू नेत्याची आपल्याला गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या राहुल गांधींनी ज्या प्रकारे भारत जोडो यात्रा सुरु केली आहे, त्यातून जनता एकत्र येत आहे. त्यामुळे देशातील काँग्रेसची ही विचारसरणी तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण