AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाने कमी केले मानवाचे आयुष्य, सरासरी वयात किती झाली घट वाचा…

Corona effet Life Expectancy Dropped | नवीन संशोधनामुळे कोरोनातून बरे झालेल्यांना इतर आजार होत असल्याचे अभ्यासातूनही समोर आले आहे. कोरोना झालेले काही लोक अनेक आजारांनी त्रस्त होत आहे. यावरून करोनाचे विध्वंसक परिणाम दिसून येत आहेत, असे संशोधकांनी अहवालात नमूद केले आहे.

कोरोनाने कमी केले मानवाचे आयुष्य, सरासरी वयात किती झाली घट वाचा...
| Updated on: Mar 13, 2024 | 4:23 PM
Share

नवी दिल्ली | 13 मार्च 2024 : कोरोनाचा धोका संपलेला आहे. परंतु कोरोनाचे दुष्यपरिणाम संपले नाही. कोरोना झालेल्यापैकी काही जणांवर अजून त्यांचे परिणाम जाणवत आहे. एकंदरीत सर्व मानव जातीसाठी चिंता निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. वैद्यकीय विज्ञानामुळे मानवाचे वाढलेले आयुष्य कोरोनाने कमी केले आहे. कोरोनानंतर मानवाचे सरासरी आयुष्य 1.6 वर्षांनी कमी झाले आहे. ‘द लॅन्सेट जर्नल’ने केलेल्या संशोधनात ही माहिती समोर आली आहे. “ज़िंदगी बड़ी होनी चाहिए, जहांपनाह, लंबी नहीं”, हे आनंद चित्रपटातील संवाद यामुळे पुन्हा चर्चेला जात आहेत.

रिपोर्टमध्ये आहे काय

नवीन वैद्यकीय सुविधांमुळे मानवाचे आयुष्य वाढत होते. 1950 मध्ये मानवाचे सरासरी वय 49 वर्षे होते, ते 2019 मध्ये 73 वर्षांपेक्षा जास्त झाले. परंतु 2019 मध्ये कोरोना आला. त्यानंतर ही प्रक्रिया उलटी झाली. 2019 ते 2021 दरम्यान मानवाचे सरासरी आयुष्य 1.6 ने घटले आहे. कोरोनोचा हा सर्वात गंभीर दुष्परिणाम समोर आला आहे. जगातील 84 टक्के देशांमधील आयुर्मान घटल्याचे अहवालात म्हटले आहे.

पुरुषांचा मृत्यूदर 22% वाढला

कोरोना दरम्यान 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषांचा मृत्यूदर 22 टक्के वाढला आहे. महिलांमध्ये हे प्रमाण 17 वाढले आहे. 2020 आणि 2021 दरम्यान जगात 13.1 कोटी लोकांचा मृत्यू झाला. त्यात 1.6 कोटी मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे COVID-19 बालकांचा मृत्यूदर कमी झाला. 2019 तुलनेत 2021 मध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा मृत्यूदर कमी झाला आहे.

कोरोनातून बरे झालेल्यांना आजार

नवीन संशोधनामुळे कोरोनातून बरे झालेल्यांना इतर आजार होत असल्याचे अभ्यासातूनही समोर आले आहे. कोरोना झालेले काही लोक अनेक आजारांनी त्रस्त होत आहे. यावरून करोनाचे विध्वंसक परिणाम दिसून येत आहेत, असे संशोधकांनी अहवालात नमूद केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग कान आणि डोळ्यांच्या क्षमतेवर थेट हल्ला करत आहे, अशा तक्रारी समोर येत आहेत.

अखेर भाजपचा गटनेता ठरला! गणेश खणकरांची वर्णी
अखेर भाजपचा गटनेता ठरला! गणेश खणकरांची वर्णी.
... म्हणून हा कट शिजला, अन् ठिणगी पडली! विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
... म्हणून हा कट शिजला, अन् ठिणगी पडली! विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप.
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला...
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला....
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या.
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं.
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!.
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?.
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?.
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?.