AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coronavirus: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, 24 तासात 3303 जणांचा मृत्यू

देशातील नव्या कोरोना रुग्णांचे दैनंदिन प्रमाण आता एक लाखाच्या खाली आले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा ही अद्यापही चिंतेची गोष्ट आहे. | Coronavirus updates

Coronavirus: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, 24 तासात 3303 जणांचा मृत्यू
कोरोना व्हायरस
| Edited By: | Updated on: Jun 13, 2021 | 9:46 AM
Share

नवी दिल्ली: गेल्या 24 तासांमध्ये देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झालेली दिसत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात देशात कोरोनाच्या 80834 नव्या कोरोना रुग्णांची (Coronavirus) नोंद झाली. तर 3303 जणांचा मृत्यू झाला. तर काल दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या 1,32,062 रुग्णांना घरी सोडण्यात आले. (Coronavirus patients in India last 24 hours)

देशातील नव्या कोरोना रुग्णांचे दैनंदिन प्रमाण आता एक लाखाच्या खाली आले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा ही अद्यापही चिंतेची गोष्ट आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 80,834

देशात 24 तासात डिस्चार्ज – 1,32,062

देशात 24 तासात मृत्यू – 3,303

एकूण रूग्ण – 2,94,39,989

एकूण डिस्चार्ज – 2,80,43,446

एकूण मृत्यू – 3,70,384

एकूण सक्रिय रुग्ण – 10,26,159

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 25,31,95,048

काल दिवसभरात राज्यात कोरोनाचे 10697 नवे रुग्ण

राज्यात शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या 10697 नव्या रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारपेक्षा ही संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसत आहे. यामुळे आजपर्यंत राज्यात करोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 58 लाख 98 हजार 550 इतकी झाली आहे. मात्र, त्याचवेळी यातले 56 लाख 31 हजार 767 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 95.48 टक्के इतका झाला आहे. तर 14910 रुग्णांना काल दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला.

कोल्हापुरातील परिस्थिती अद्यापही चिंताजनक; अजित पवार आढावा घेणार

सध्या राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सापडताना दिसत आहेत. लॉकडाऊन करुनही येथील परिस्थितीत विशेष फरक पडलेला नाही. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील. त्यानंतर राज्य सरकार काही मोठी पावले उचलणार का, हे पाहावे लागेल.

संबंधित बातम्या:

Coronavirus: रत्नागिरीत आठ दिवसांचा लॉकडाऊन फेल; कोरोना पॉझिटिव्हिटी रेटमध्ये राज्यात दुसरा क्रमांक

वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षता: अजित पवार

ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त, रेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर व्हॅक्सिनवर 5 टक्के कर कायम; केंद्र सरकारची मोठी घोषणा

(Coronavirus patients in India last 24 hours)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.