AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coronavirus: कोरोना व्हायरसची दुसरी लाट रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींची पंचसूत्री

आजच्या घडीला देशभरात 96 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील मृत्यूदरही कमी असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. | PM Modi Coronavirus

Coronavirus: कोरोना व्हायरसची दुसरी लाट रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींची पंचसूत्री
PM-Modi
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Mar 18, 2021 | 10:56 AM
Share

नवी दिल्ली: देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व राज्यांमध्ये सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेचे कौतुक केले. तसेच राज्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ठोस योजना तयार करुन कामाला लागावे, असे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले. (PM Narnedra Modi interaction with CM’s)

भारत गेल्या वर्षभरापासून कोरोनाविरुद्ध लढत आहे. आपण ज्याप्रकारे कोरोनाशी लढत आहोत तो जगासाठी एक आदर्श वस्तुपाठ झाला आहे. आजच्या घडीला देशभरात 96 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील मृत्यूदरही कमी असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. मात्र, कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी त्यांनी राज्यांना काही उपायही सांगितले.

पंतप्रधान मोदींनी राज्यांना कोणती पंचसूत्री दिली?

1. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील 70 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा वृद्धीदर 150 टक्के इतका आहे. कोरोनाची ही दुसरी लाट आपल्याला थोपवायला पाहिजे. यासाठी आपल्याला ठोस आणि वेगाने निर्णय घ्यावे लागतील.

2. आपण कोरोनाविरुद्ध मोठ्या लढाईनंतर निर्णायक टप्प्यावर पोहोचलो आहोत. याठिकाणी आत्मविश्वासाचे रुपांतर बेजबाबदारपणात होता कामा नये. जनतेमध्ये तणाव निर्माण होता कामा नये आणि त्यांना त्रासापासून मुक्तीही मिळायला हवी.

3. टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट ही त्रिसूत्री गेल्या वर्षभरात प्रभावीपणे राबवली गेली. आतादेखील त्याची तितक्यात गंभीरतेने अंमलबजावणी झाली पाहिजे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला पाहिजे. तसेच RT-PCR टेस्ट चे प्रमाण कायम 70 टक्क्यांपेक्षा जास्त राहिले पाहिजे.

4. लहान शहरांमध्ये आपल्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवायला हवे. छोट्या शहरांमध्ये रेफरल सिस्टीम आणि रुग्णवाहिकांचे नेटवर्क वाढवण्यावर भर दिला पाहिजे.

5. देशातील लसीकरणाची गती सातत्याने वाढत आहे. आपण एका दिवसात 30 लाख लोकांना लस देण्यापर्यंतची मजल मारली आहे. मात्र, लसीच्या काही मात्रा फुकट जात आहेत. हे प्रमाण कमी झाले पाहिजे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही प्रतिबंधक लस महत्त्वाचे हत्यार आहे. त्यामुळे लसीचा अपव्यय टाळणे गरजेचे असल्याचे मोदींनी सांगितले.

संबंधित बातम्या:

Pune Lockdown Updates : पुण्यात एकाच दिवशी 2500 रुग्ण, महापालिका प्रशासन हादरलं, हे असतील नवे निर्बंध?

Corona Update : देशातील एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात! कोणत्या जिल्ह्यांमध्ये चिंताजनक स्थिती?

(PM Narnedra Modi interaction with CM’s)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली