AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंदोलनाला विरोध करण्याची देशात नवी इको सिस्टिम सक्रिय; देवेंद्र फडणवीस यांची टीका

आपण श्वास घेतो. आपल्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवत नाही. पण ऑक्सिजन कमी झालं की मग जाणवतं. तसंच सुशासनचं आहे. व्यवस्था करप्ट झाल्यावर मग आपल्याला सुशासनाचं महत्त्व कळतं. मोदींनी हेच सुशासन सांगितलं. याच सुशासनाला लोकांनी मतदान करायचं आहे, असं आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते सुशासन महोत्सवात बोलत होते.

आंदोलनाला विरोध करण्याची देशात नवी इको सिस्टिम सक्रिय; देवेंद्र फडणवीस यांची टीका
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 09, 2024 | 9:30 PM
Share

नवी दिल्ली | 9 फेब्रुवारी 2024 : देशात विकासकामांना सातत्याने विरोध होत आहे. विरोध करणाऱ्यांबाबत पंतप्रधानांनी नवी व्याख्या दिली आहे. पंतप्रधानांनी त्यांना आंदोलनजीवी संबोधलं आहे. मला असे अनेक आंदोलनजीवी दिसले. काही पक्ष आंदोलनजीवी आहेत आणि काही लोकही आंदोलनजीवी आहेत. विकासाला विरोध करणारी एक कम्युनिटीच तयार झाली आहे. प्रत्यके प्रकल्पात हे लोक आहेत. आम्ही अधिक खोलात गेलो तर त्यांना पैसाही एकाच ठिकाणाहून मिळत असल्याचं दिसून आलं, असा दावा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने सुशासन महोत्सवाचं आयोजन केलं होतं. त्यात देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत झाली. मुकुंद देशपांडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी हा दावा केला. आपल्या देशात विकासाचा विरोध करण्यासाठी एक इको सिस्टीमही तयार झाली आहे. या इको सिस्टिमला आम्हाला तोडावं लागतं. जेव्हा सरकार जनतेला म्हणते, आम्ही तुमचं भलं करतो, तेव्हा विरोधक सरकार तुमचं नुकसान करतंय असं सांगतात. अशावेळी लोकांचा विश्वास विरोधकांवर अधिक बसतो. त्यांना वाटतं सरकारचा यात काहींना काही डाव आहे. त्यामुळे विश्वासहार्यता महत्त्वाची आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मोदींनी डिलिव्हरी सिस्टिम बदलली

सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशात मोदींनी जो चमत्कार केला तो म्हणजे देशातील डिलिव्हरी सिस्टिम बदलली. देशात अनेक स्किम झाल्या. पंचवार्षिक योजना झाल्या, गरीबी हटावचे नारे झाले, अनेक योजना झाल्या. हेतू काही असेल पण डिलिव्हरी सिस्टीम करप्ट होती. त्यामुळे सामान्यांना लाभ मिळत नव्हता. मोदींनी आधी या डिलिव्हरी सिस्टिमवर वार केला आणि नवी डिलिव्हरी सिस्टिम तयार केली. त्यात तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर केला. चेक अँड बॅलेन्सचाही वापर केला. त्याचं उत्तरदायित्वही दिलं. त्यानंतर या गोष्टीचं लोकशाहीकरणही केलं, असंही फडणवीस म्हणाले.

यालाच सुशासन म्हणतात

मोदी कोणतीही घोषणा करतात तेव्हा ते कोणत्या तरी राज्यात जातात. तिथे मोठा कार्यक्रम करतात. प्रत्येक राज्याला या कार्यक्रमात सामावून घेतात आणि योजनेची घोषणा करतात. मोदींची योजना जेव्हा घोषित होते तेव्हा पहिल्याच दिवशी सात ते आठ कोटी लोकांना माहीत होतं. यालाच सुशासन म्हणतात, असं फडणवीस म्हणाले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.