AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: मालिका जिंकली तरीही कॅप्टन श्रेयस अय्यर म्हणतोय अजून काम बाकीच, असं का म्हणाला?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा टी-20 सामना भारतीय संघाने जिंकला. आता यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने एक विधान केले त्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

IND vs ZIM: मालिका जिंकली तरीही कॅप्टन श्रेयस अय्यर म्हणतोय अजून काम बाकीच, असं का म्हणाला?
| Updated on: Jul 26, 2026 | 9:20 AM
Share

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकले आणि आता एक उर्वरित सामना आज रंगणार आहे. दोन सामने जिंकल्यामुळे आता भारतीय संघाने मालिका आधीच जिंकली आहे. आता ही मालिका जिंकली तर कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात भारतीय संघ पहिली टी-20 मालिका जिंकेल. आता सामना संपताच कर्णधार श्रेयस अय्यरने एक विधान केले ज्यामुळे भारतीय संघाने टेन्शन वाढले आहे. झिम्बाब्वेविरुद्ध 90 धावांनी विजय मिळवल्यानंतर, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितले की, “वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला झालेल्या दुखापतीमुळे रविवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम टी20 सामन्यात संघाला काही बदल करावे लागू शकतात. ” आपल्या दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकत असताना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे यादवला मैदान सोडावे लागले. दुखापत होण्यापूर्वीच त्याने दोन बळी घेतले होते.

दुसऱ्या टी20 सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 गडी गमावून 219 धावा केल्या. प्रत्युत्तरात, यजमान झिम्बाब्वेला 17.5 षटकांत केवळ 129 धावाच करता आल्या. भारताकडून इशान किशनने 81 आणि तिलक वर्माने नाबाद 60 धावा केल्या. या विजयामुळे भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यातील भारताच्या विजयानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, “दुर्दैवाने, आमचा एक खेळाडू जखमी आहे, त्यामुळे उद्याच्या (रविवारच्या) सामन्यासाठी संघात काही बदल दिसू शकतात. ईशान आणि तिलकने शानदार फलंदाजी केली. मला वाटले होते की या खेळपट्टीवर 180 ते 200 धावा एक स्पर्धात्मक धावसंख्या असेल, पण आम्ही 220 धावा केल्या, जे संघासाठी बोनस ठरले. मैदानावर आपली हीच वृत्ती असायला हवी. वर्तमानात राहणे आणि आपल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.”

तरुण संघाच्या निर्भय वृत्तीबद्दल अय्यर म्हणाला, “होय, खेळाकडे पाहण्याचा हाच दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. मला वाटते की हे सर्व वृत्तीवर अवलंबून असते. भूतकाळातील कामगिरीवर जास्त लक्ष केंद्रित करू नका. पुढे जात राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा लागतो. उद्या आणखी एक संधी आहे, त्यामुळे आम्ही त्यासाठी उत्सुक आहोत.”

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं