AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाकडून खरंच इंधन खरेदी थांबवली? ट्रम्प यांच्या दाव्यानंतर आता केंद्र सरकार फ्रंटफुटवर

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादल्याने आणि रशियाकडून तेल खरेदीस मज्जाव केल्याने तणाव वाढला आहे. भारताने तेल खरेदी थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. त्यानंतर आता मोदी सरकारने मोठे वक्तव्य केले आहे.

रशियाकडून खरंच इंधन खरेदी थांबवली? ट्रम्प यांच्या दाव्यानंतर आता केंद्र सरकार फ्रंटफुटवर
तेलाचे महाभारत
| Updated on: Aug 02, 2025 | 11:25 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ कार्डने जगभरात धुमाकूळ घातला आहे. त्यांनी 70 हून अधिक देशांना टॅरिफ लागू केला आहे. भारतावर सुद्धा तो लादण्यात आला. तो एका आठवड्यासाठी टाळण्यात आला. ट्रम्प यांनी भारत आणि रशियातील तेल व्यापारावर आक्षेप घेतला आहे. शस्त्र खरेदी करारावर नाराजी व्यक्त केली आहे. तर भारताने रशियाकडून इंधन खरेदी थांबवली असा दावा त्यांनी केला. त्यानंतर मोदी सरकारने त्यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर मोठे वक्तव्य केले आहे.

ट्रम्प म्हणाले काय?

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. मी असंच ऐकलं आहे, हे खरं की खोटं याची मला माहिती नाही. पण हे एक चांगलं पाऊल आहे. आम्ही समोर काय होते, याकडे लक्ष ठेऊन आहोत. ट्रम्प यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

भारताची भूमिका काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर सरकारकडून प्रतिक्रियेची अपेक्षा व्यक्त होत होती. खरंच भारताने रशियाकडून इंधन खरेदी थांबवली आहे का? तशी काही योजना आहे का? असे प्रश्न विचारण्यात येत होते. दरम्यान सरकारी तेल खरेदी करणाऱ्या कंपन्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रशियाकडून तेल खरेदी न करण्यासंदर्भात कोणताही शासकीय आदेश आले नसल्याची प्रतिक्रिया कंपन्यांनी दिली. त्यामुळे अमेरिकेच्या दबावाखाली भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवणार नाही, असे तरी सध्या समोर येत आहे. भारत तेल खरेदी करणार नाही, अशा अफवांनी ट्रम्प हे खूश असल्याचे आता तरी समोर येत आहे. तर एक दिवसापूर्वी भारत आणि रशियात काय संबंध आहेत, याने आपल्याला काही फरक पडत नसल्याचे ते म्हटले होते.

ट्रम्प मित्रच का?

डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे चांगले मित्र असल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे त्यांनी भारतावर टॅरिफ बॉम्ब टाकला आहे. लक्षात ठेवा, भारत हा आपला मित्र आहे, पण गेल्या काही वर्षांत आपण त्याच्यासोबतचा व्यापार कमी केला आहे. कारण या देशाचे टॅरिफ जास्त आहे. त्यांच्या लष्करी साहित्याची खरेदी त्यांनी रशियाकडूनच जास्त केली आहे. त्यामुळे भारताला ऑगस्त महिन्यात 25 टक्के टॅरिफ आणि दंड द्यावा लागेल.

भारतीय तेल कंपन्या इराण किंवा व्हेनेझुएला कडून खनिज तेल खरेदी करत नाही. कारण या देशांवर अमेरिका कडून घातलेले निर्बंध आहेत. भारतीय तेल कंपन्या सातत्याने अमेरिका कडून सुचवलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करत आहेत. विशेषतः रशियन खनिज तेलाच्या बाबतीत, त्यांनी अमेरिकेने ठरवलेल्या 60 डॉलर प्रती बॅरल या किंमत मर्यादेचं या कंपन्यांनी पालन केलं आहे. तर अलीकडेच युरोपियन संघाने (EU) रशियन कच्च्या तेलासाठी 47.6 डॉलर प्रती बॅरल ही नवीन किंमत मर्यादा सुचवली आहे. ही किंमत मर्यादा सप्टेंबर महिन्यापासून लागू होणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.