AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmers Protest: 6 महिने होऊनही मागण्या मान्य नाही, शेतकरी 26 मे रोजी काळा दिवस पाळणार, काँग्रेससह 12 विरोधी पक्षांचा पाठिंबा

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाला 26 मे रोजी 6 महिने पूर्ण होत आहेत.

Farmers Protest: 6 महिने होऊनही मागण्या मान्य नाही, शेतकरी 26 मे रोजी काळा दिवस पाळणार, काँग्रेससह 12 विरोधी पक्षांचा पाठिंबा
| Updated on: May 24, 2021 | 5:10 AM
Share

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाला 26 मे रोजी 6 महिने पूर्ण होत आहेत. 6 महिने होऊनही सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 26 मे हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. या दिवशी देशभरात आंदोलनं होणार आहेत. याला काँग्रेसह देशातील 12 विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलाय (Farmers call Black day on 26th May after 6 month completion of protest 12 opposition parties support).

संयुक्त किसान मोर्चाने शेतकरी आंदोलनाला 6 महिने पूर्ण होत असतानाही सरकारने मागण्या मान्य न केल्याविरोधात देशभरात 26 मे रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर देशातील विरोधी पक्षांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. याबाबत 12 पक्षांनी संयुक्त निवेदन जारी केलंय. काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “संयुक्त किसान मोर्चाने 26 मे रोजी देशभरात जाहीर केलेल्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा देतो. त्या दिवशी शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला 6 महिने पूर्ण होत आहेत.”

“सरकारने ताठरता सोडून तात्काळ शेतकऱ्यांसोबत चर्चा करावी”

या पाठिंबा पत्रात विरोधी पक्षांनी सांगितलं, “12 मे 2021 रोजी आम्ही संयुक्तपणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. यात सीमेवरील लाखो अन्नदात्यांना साथीरोगापासून वाचवण्यासाठी कृषी कायदे मागे घ्या. जेणेकरुन ते सीमेवरुन परतून भारतीयांसाठी आपलं अन्न पिकवण्याचं काम सुरु ठेऊ शकतील. आम्ही तात्काळ कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करतो. तसेच स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशीनुसार शेत मालाला हमीभावाची कायदेशीर तरतूद द्यावी, अशीही मागणी करतो. या मागण्यांवर सरकारने ताठरता सोडावी आणि तात्काळ शेतकऱ्यांसोबत चर्चेला सुरुवात करावी.”

शेतकऱ्यांना पाठिंबा देणारे 12 विरोधी पक्ष कोणते?

  • सोनिया गांधी (काँग्रेस)
  • एचडी देवेगौड़ा (जद-एस)
  • शरद पवार (एनसीपी)
  • ममता बनर्जी (टीएमसी)
  • उद्धव ठाकरे (शिवसेना)
  • एमके स्टॅलिन (डीएमके)
  • हेमंत सोरेन (झामुमो)
  • फारूक अब्दुल्ला (JKPA)
  • अखिलेश यादव (समाजवादी पार्टी)
  • तेजस्वी यादव (RJD)
  • डी राजा (सीपीआई)
  • सीताराम येचुरी (CPI-M)

या 12 पक्षांव्यतिरिक्त आम आदमी पक्षाने (आप) देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. या सर्वांनी सरकारकडे शेतकऱ्यांसोबतची चर्चा तातडीने सुरु करण्याची आणि कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केलीय.

हजारो शेतकरी दिल्लीकडे रवाना

कोरोना लॉकडाऊनच्या (Corona Lockdown) काळात हजारो शेतकरी रविवारी (23 मे) हरियाणातील करनालमधून दिल्लीला रवाना झाले. ते 26 मे रोजी दिल्लीत ‘काळा दिवस’ साजरा करण्यासाठी दिल्लीकडे रवाना झालेत. पंजाबच्या संगरूरमधूनही अनेक लोक दिल्लीकडे येत आहेत.

हेही वाचा :

Farmers Protest : कृषी कायद्याविरोधात संघर्ष सुरूच, मुख्यमंत्री खट्टर यांच्याविरोधातील शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, अनेकजण जखमी

‘मी पैशांसाठी पगडी घालत नाही’, आयपीएलचा स्टार खेळाडू हरप्रीतची अक्षय कुमारला चपराक

पंजाबमध्ये संतापलेल्या शेतकऱ्यांकडून भाजप आमदाराला मारहाण, कपडे फाडत काळेही फासले

व्हिडीओ पाहा :

Farmers call Black day on 26th May after 6 month completion of protest 12 opposition parties support

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.