AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीचा राग आला अन् घर सोडले; महिलेवर आठवडाभर 5 जणांकडून सामूहिक बलात्कार

काही तासांनंतर तिन्ही आरोपींनी खोलीत जाऊन तिचे लैंगिक शोषण केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. आणखी दोन ऑटोचालकही या गुन्ह्यात सामील झाले. पीडितेला 17 ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत त्याच खोलीत बंदिस्त ठेवण्यात आले होते.

पतीचा राग आला अन् घर सोडले; महिलेवर आठवडाभर 5 जणांकडून सामूहिक बलात्कार
पतीचा राग आला अन् घर सोडले; आठवडाभर 5 जणांकडून सामूहिक बलात्कार
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 5:28 PM
Share

पाटणा : पतीचा राग आल्याने घर सोडून गेलेल्या एका विवाहितेवर पाच जणांनी कथितरीत्या आठवडाभर सामूहिक बलात्कार केल्याची घटना पटनामध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी पतीसोबत झालेल्या वादानंतर ही महिला घर सोडून गेली होती. तिने कोलकाताला जाण्याचा निर्णय घेतला आणि ट्रेन पकडण्यासाठी पाटणा जंक्शन गाठले. यानंतर ती महिला एका हॉटेलमध्ये गेली, जिथे तिने हॉटेल मालकाला कोलकाताला जाणाऱ्या ट्रेनबद्दल विचारले. (Five gang-raped a woman in Patna for a week)

हॉटेल मालक मित्राकडे घेऊन गेला

जक्कनपूर पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्याने सांगितले की, हॉटेलचा मालक गोपाल याने त्याचा मित्र अमितला त्या महिलेबद्दल सांगितले आणि दोघे तिला अजय नावाच्या दुसऱ्या व्यक्तीकडे घेऊन गेले, ज्याने करबीघिया भागात खोलीची व्यवस्था केली, जिथे त्याने तिला ट्रेन येईपर्यंत थांबायला सांगितले.

चोवीस तास नजकैदेत ठेवले

काही तासांनंतर तिन्ही आरोपींनी खोलीत जाऊन तिचे लैंगिक शोषण केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. आणखी दोन ऑटोचालकही या गुन्ह्यात सामील झाले. पीडितेला 17 ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत त्याच खोलीत बंदिस्त ठेवण्यात आले होते. एक आरोपी तिच्यावर नजर ठेवण्यासाठी चोवीस तास खोलीच्या बाहेर राहायचा.

पतीने दाखल केली मिसिंगची तक्रार

जेव्हा पीडित महिला कोलकाताला पोहचली नाही, तेव्हा तिच्या पतीने जक्कनपूर पोलिस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली. तिचा मोबाईल सर्विलांसवर ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये पाटणा जंक्शन हे तिचे शेवटचे स्थान असल्याचे आढळले. या अंतर्गत शोधमोहीम सुरू करण्यात आली.

5 आरोपींना अटक

गुप्त माहितीच्या आधारे पोलीस महिलेला ज्या घरात डांबून ठेवले होते तिथे पोहचत या महिलेची सुटका केली आणि एक आरोपी गोलू याला अटक करण्यात आली. महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे इतर आरोपी गोपाल कुमार, अमित कुमार, अजय कुमार आणि अरुण यांनाही अटक करण्यात आली आहे.

छेडछाड करणाऱ्या दारुड्याला महिलेने भररस्त्यात चोपले

मध्य प्रदेशातील अनुपपूरमध्ये एका दारुड्याला महिलेचा विनयभंग करणे महागात पडले. महिलेने त्याला रस्त्याच्या मध्यभागी ओढत आणले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. असे सांगितले जात आहे की, दारूच्या नशेत प्रवासादरम्यान महिलेशी गैरवर्तन केले. बराच काळ महिलेने त्याचा उर्मटपणा सहन केला. पण बस अनुपपूर बस स्टँडवर पोहोचताच महिलेने त्याला खाली उतरवले आणि तिला चांगला धडा शिकवला. (Five gang-raped a woman in Patna for a week)

इतर बातम्या

पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर चाकूहल्ला, भररस्त्यात हत्याकांड, नाशकात चाललंय काय?

आलिशान हॉटेलमध्ये सुट्ट्यांसाठी गेलेल्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू, तीन ठिकाणी चौघांचे मृतदेह

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.