Explainer: ममता, विजयन, स्टॅलिन; राज्य वेगळी, पक्ष वेगळा, पण आव्हान मात्र एक, विधानसभा निवडणुकीत कुणाचे देव पाण्यात?
5 State Vidhansabha Election: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेले आहे. कारण यातील चार राज्यात भाजप सत्तेत नाही आणि भाजपला सत्तेत यायचे आहे. केरळ, आसाम, तामिळनाडूमध्ये भाजपला सत्तेत वाटेकरी व्हायचं आहे. त्याचवेळी येथील प्रमुख नेत्यांनी देव पाण्यात ठेवले आहे. काय आहे त्यांच्यासमोरील आव्हान?

Assam-West Bengal-Puducherry-Keralam-Tamilnadu: पाच राज्यांतील निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ही राज्य कवेत घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. गेल्या कित्येक वर्षात या राज्यांमध्ये भाजप सत्तेत वाटेकरी नाही. या राज्यांमध्ये सत्तेचा सुकाणू आपल्या हातात असावा यासाठी भाजपची गेल्या पाच वर्षांपासून मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये लवकरच मतदान होईल. आसाम आणि केरळममध्ये मतदान झाले आहेत. तर पुद्दुचेरी या केंद्र शासित प्रदेशात मतदारांनी कौल दिलेला आहे. सत्तेची कमान कुणाकडे असेल आणि सत्ता पालट होते का याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. त्याचवेळी सध्याच्या नेतृत्वापुढे यापेक्षा अजून एक मोठे आव्हान उभे ठाकलेले आहे. ममता बॅनर्जी असो वा एम के स्टॅलिन, केरळचे विजयनन असो की भाजपचे हिमंत बिस्वा सरमा असोत सर्वांसमोर त्यांच्या अस्तित्वाची मोठे आव्हान आहे. ...
