AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड यूसुफ अजहरचा खात्मा ते 40 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू, डीजीएमओच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

भारतानं पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक मारले गेल्याचं डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी अधिकृतपणे सांगितलं आहे.

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड यूसुफ अजहरचा खात्मा ते 40 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू, डीजीएमओच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 11, 2025 | 8:23 PM
Share

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट होती, या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं, भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले तसेच 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले, दरम्यान आता भारत आणि पाकिस्तामध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आज लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या उच्च अधिकाऱ्यांची एक संयुक्त पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देण्यात आली. भारतानं पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक मारले गेल्याचं डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी अधिकृतपणे सांगितलं आहे.

ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी म्हटलं आहे की, 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला, भारतीय जवानांवर देखील हल्ले वाढत आहेत. जेव्हा पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हाच आम्ही निश्चय केला होता, की आता आम्ही गप्प बसणार नाहीत. याचा उत्तर दिलं जाईल, यातूनच आम्ही ऑपरेशन सिंदूर राबवलं.

9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त, 100 दहशतवाद्यांचा खात्मा

पुढे बोलताना जनरल घई यांनी सांगितलं की आम्ही सात मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून 9 दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हल्ला केला, यामध्ये IC-814 हायजॅक आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड यूसुफ अजहर, अब्दुल मलीक रऊफ आणि मुदस्सिर अहमद हे कुख्यात दहशतवादी मारले गेले. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले.

भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने देखील भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तसेच सिमावर्ती भागामध्ये पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार करण्यात आलास, पाकिस्तानकडून मुद्दामहून सामान्य नागरिकांची वस्ती असलेल्या भागांना टार्गेट करण्यात आलं, तसेच धार्मिक स्थळांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला.9 आणि 10 मे रोजी पाकिस्तानकडून रात्रीच्या सुमारास हे हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये भारतीय सैन्य तळांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न झाला अशी माहिती घई यांनी यावेळी दिली. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याला प्रत्यु्त्तर म्हणून भारतीय सैनिकांनी केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक देखील मारले गेले, आमचं टार्गेट हे पाकिस्तानमधील सामान्य नागरिक नव्हते तर दहशतवादी होते असंही, घई यांनी यावेळी सांगितलं.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.