AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Yogi यांच्या यूपीत आणखी एका गुंडाचा एन्काऊंटर, पाहा आता कोणाचा लागला नंबर

उत्तर प्रदेशात गुंडाचा खात्मा सुरुच आहे. गेल्या २३ दिवसात ४ गुंडाचा खात्मा करण्याच यूपी पोलिसांना यश आलंय.

CM Yogi यांच्या यूपीत आणखी एका गुंडाचा एन्काऊंटर, पाहा आता कोणाचा लागला नंबर
| Updated on: May 04, 2023 | 5:47 PM
Share

लखनऊ : यूपी पोलिसांनी आणखी एका कुख्यात गुंडाचा एन्काऊंटर केला आहे. 23 दिवसांत उत्तर प्रदेशातील तीन मोठ्या माफियांचा खात्मा केला आहे. यूपी एसटीएफने गुरुवारी कुख्यात अनिल दुजाना याचा एन्काऊंटर ( gangster anil dujana encounter ) केला. कुख्यात गुंड अनिल दुजाना याचा मेरठमध्ये एन्काऊंटर झाला आहे. यूपी एसटीएफ आणि अनिल दुजाना टोळी यांच्यात थेट चकमक झाली, ज्यामध्ये अनिल दुजाना ठार झाला. 12 एप्रिलपासून माफियांना ठार करण्याचा सिलसिला सुरुच आहे. अनिल दुजाना याच्यावर अडीच लाखांचे बक्षीस होते. या दरम्यान गुंड आदित्य राणा याला पोलिसांनी चकमकीत प्रथम ठार केले. यानंतर 13 एप्रिल रोजी यूपी पोलिसांनी अतिक अहमदचा मुलगा असद अहमद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना आणखी एका चकमकीत ठार मारले. दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत माफियांना मातीत गाडू असे म्हटले होते.

गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, दिल्ली-एनसीआर आणि हरियाणामध्ये अनिल दुजाना याची दहशत होती. आठवडाभरापूर्वी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. तुरुंगातून सुटका होताच त्याने गौतम बुद्ध नगरमध्ये आपल्या विरोधात साक्ष देणाऱ्या लोकांना धमकावले. यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते आणि एका चकमकीत एसटीएफने त्याला चकमकीत ठार केले.

आदित्य राणा

23 ऑगस्ट 2022 रोजी आदित्य शाहजहानपूरमधील ढाब्यातून पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता. यानंतर 12 एप्रिल रोजी रात्री उशिरा बुऱ्हाणपूर येथे पोलीस आणि आदित्य राणा यांच्यात चकमक झाली. या चकमकीत आदित्य राणा जखमी झाला, त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुख्यात गुन्हेगार आदित्य राणाविरुद्ध 6 खुनाचे आणि 13 दरोड्याच्या गुन्ह्यांसह 47 गुन्हे दाखल आहेत. अडीच लाखांचे बक्षीस आदित्य राणावर होते. अलीकडेच पोलिसांनी त्याच्या टोळीतील ६ जणांना अटकही केली होती.

असद आणि गुलाम

उमेश पाल हत्येप्रकरणी यूपी पोलीस असद आणि गुलाम या दोघांचाही शोध घेत होते. ते बराच काळ फरार होते, त्यामुळे दोघांवर पाच लाख रुपये बक्षीस होते. 13 एप्रिल रोजी झाशी येथे झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोघांनाही ठार केले. असद हा माफिया अतिक अहमदचा मुलगा होता. उमेश पाल हत्येप्रकरणी असदवर शूटर्ससोबत कट रचल्याचा आरोप होता.

अनिल दुजाना

18 खून आणि 62 गंभीर गुन्ह्यातील आरोपी कुख्यात गुन्हेगार अनिल दुजाना याला यूपी एसटीएफने ठार केले आहे दुजाना खून, खंडणी, दरोडा, जमीन हडप करणे, सुपारी घेऊन खून करणे, टोळी चालवत असे. दुसरा गुंड सुंदर भाटी जो सध्या तुरुंगात आहे, दुजाना हा त्याचा कट्टर शत्रू होता. भाटी यांच्यावर दुजानाने एके ४७ ने हल्ला केला होता. तिहेरी हत्याकांडात दुजानाचाही सहभाग होता.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.