Hathras | घरात डांबून कुटुंबाला मारहाण, फोनही काढून घेतले, हाथरस पीडितेच्या भावाचा आरोप

पोलीस आम्हाला धमकावत आहेत. आमच्या कुटुंबीयांवर दबाव टाकत आहेत, असे गंभीर आरोप पीडितेच्या भावाने केले आहेत. (Hathras Victim Brother Alligation Up Police)

Hathras | घरात डांबून कुटुंबाला मारहाण, फोनही काढून घेतले, हाथरस पीडितेच्या भावाचा आरोप
Follow us
| Updated on: Oct 02, 2020 | 4:24 PM

हाथरस : हाथरसच्या पीडितेचे कुटुंबीय सध्या दहशतीच्या वातावरणात आहेत. पोलिसांनी पीडितेच्या संपूर्ण घराला वेढा दिलाय. घरातून कुणालाही निघू देत नाहीत. पोलिसांचा डोळा चुकवून पीडितेचा एक भाऊ माध्यम प्रतिनिधींजवळ आला आणि पोलिस कुटुंबाला अमानुष पद्धतीने त्रास देत असल्याता आरोप त्याने केला. (Hathras Victim Brother Alligation Up Police)

“पोलीस आम्हाला धमकावत आहेत. आमच्या कुटंबीयांवर दबाव टाकत आहेत. त्यांनी आमचे फोन देखील काढून घेतले आहेत. आमच्या घरच्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलायचंय पण पोलिस आम्हाला बोलूही देत नाहीत”, असे आरोप पीडितेच्या भावाने केले.

“काल पोलिसांनी आमच्या काकाच्या छातीत लाथ मारली. काका काही वेळ बेशुद्ध पडले होते. माझी बहीण गेली याचं आभाळाएवढं दु:ख आमच्यावर आहे. वरुन पोलिस आता आम्हाला मरण यातना देत आहेत”, असे आरोप पीडितेच्या भावाने केले आहेत. पीडेतेचा भाऊ माध्यमांसोबत बोलत आहे हे पोलिसांनी काही वेळाने पाहिल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर घाबरलेला पीडितेचा भाऊ निघून गेला.

गेल्या 4 दिवसांपासून हाथरसमधलं वातावरण चांगलंच गरम झालंय. पीडितेच्या कुटुंबाला कुणालाच भेटू देत नाहीत. पीडितेच्या कुटुंबीयांचा कुणालाच विचारपूस करु देत नाहीत. आज टीएमसी नेत्यांचं शिष्टमंडळ पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला निघालेले असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. कलेक्टरांची ऑर्डर आहे, असं सांगत नेत्यांना पीडित कुटुंबाला भेटण्यापासून पोलिसांनी रोखलं.

हाथरस प्रकरण उत्तर प्रदेशातील हाथरस इथं एका मुलीवर बलात्कार झाल्याचा (Hathras rape case) आरोप आहे. चार नराधमांनी सामूहिक अत्याचार करुन मारहाण केली. यादरम्यान प्रचंड जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हाथरस प्रकरणावर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांकडून गुपचूप अंत्यसंस्कार हाथरस (Hathras) सामूहिक बलात्कार (GangRape) प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस भागात 19 वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार करत, बोलता येऊ नये म्हणून तिची जीभदेखील कापून टाकली. उपचार दरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. पीडितेचा मृतदेह तिच्या गावी आणून, उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) गुपचूप या मुलीचे अंत्यसंस्कार उरकल्याचा दावा कुटुंबाकडून करण्यात आला आहे. विनवणी करूनही पोलिसांनी मुलीचे अंत्यदर्शन करू न दिल्याने, कुटुंबियांनी आक्रोश केला आहे

राहुल गांधींना धक्काबुक्की दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी-प्रियांका गांधी यांना, काल उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं होतं. यादरम्यान राहुल गांधींना पोलिसांनी धक्काबुक्कीही केली होती. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही यमुना एक्सप्रेसवरून पायी चालत निघाले असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र काही वेळाने त्यांना सोडण्यात आले.

(Hathras Victim Brother Alligation Up Police)

संबंधित बातम्या

हाथरस अत्याचारातील पीडित कुटुंबाला धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल, नवी मुंबईत मनसे आक्रमक

हाथरसच्या मुलीवर बलात्कार झालाच नाही, यूपीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांचा दावा

Hathras rape case | मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवा, शिवसेनेची गृहमंत्र्यांकडे मागणी

पंतप्रधान बोलत का नाहीत?; जनतेला हाथरसच्या घटनेचं सत्य सांगा; शिवसेनेची मागणी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.