AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रिटिशांची भारतातील 200 वर्ष जुनी स्मशानभूमी… आजही येतो रहस्यमयी आवाज, जाताच फुटतो दरदरून घाम; काय आहे भानगड?

बरेलीत एक असे ठिकाण आहे, जे ब्रिटिशांशी जोडलेले आहे. येथे एक 200 वर्ष जुनी स्मशानभूमी आहे जी ब्रिटिशांसाठी बांधली गेली होती. या स्मशानभूमीच्या जवळ लोकांनी विचित्र अनुभव आलेले आहेत.

ब्रिटिशांची भारतातील 200 वर्ष जुनी स्मशानभूमी... आजही येतो रहस्यमयी आवाज, जाताच फुटतो दरदरून घाम; काय आहे भानगड?
Haunted Place
| Updated on: Jul 26, 2025 | 6:57 PM
Share

भारतात अशी अनेक रहस्यमयी ठिकाणे आहेत जिथे गेल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. उत्तर प्रदेशातील बरेली हे भारतातील एक जुने शहर आहे. त्यामुळे या शहराला मोठा इतिहास आहे. बरेलीत सध्या एक असे ठिकाण आहे, जे ब्रिटिशांशी जोडलेले आहे. येथे एक 200 वर्ष जुनी स्मशानभूमी आहे जी ब्रिटिशांसाठी बांधली गेली होती. या स्मशानभूमीच्या जवळ लोकांनी विचित्र अनुभव आलेले आहेत. त्यामुळे इंग्रज भारत सोडून गेल्यानंतरही सामान्य लोक या ठिकाणी जाण्याचे धाडस करत नाहीत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ब्रिटिशांची स्मशानभूमी

बरेली शहराच्या नाथनगरी कॅन्ट परिसरात एक ब्रिटिशांची स्मशानभूमी आहे. या ठिकाणाला लोक गोऱ्या लोकांची स्मशानभूमी असेही म्हणतात. या ठिकाणी अनेक ब्रिटिश सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या कबरी आहेत. मात्र यातील काही कबरी गायब झाल्या आहेत. ही स्मशानभूमी 1889 साली बांधण्यात आली होती. त्यानंतर या स्मशानभूमीत शेकडो लोकांचे मृतदेह दफन करण्यात आले आहेत.

अनेक अधिकाऱ्यांच्या कबरी

बरेलीतील ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहासकार डॉ. राजेश शर्मा यांनी या स्मशानभुमीबाबत सांगितले की, ‘ब्रिटिश लोक भारतावर राज्य करायला आले होते, त्यावेळी भारताची परिस्थिती ब्रिटिशांसाठी अनुकूल नव्हती. या भागात नाकटियाची लढाई झाली होती. यात अनेक ब्रिटिश सैनिक आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या सैनिकांना दफन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक मोठी जागा विकत घेतली, त्यानंतर तिथे या अधिकारी आणि सैनिकांच्या कबरी बांधण्यात आल्या. आजही या कबरी इथे आहेत. त्यामुळे याला ब्रिटिशांची स्मशानभूमी म्हणतात.

विचित्र आवाज ऐकू येतात

डॉ. राजेश शर्मा यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘या स्मशानभुमीबाबत बऱ्याच कथा प्रचलित आहेत. येथे रात्रीच्या वेळी कबरींमधून आवाज ऐकू येतो असं अनेकजण सांगतात. बरेली आणि आसपासच्या लढायांमध्ये मृत्यू पावलेल्या ब्रिटिशांच्या अनेक कबरी येथे आहे. त्यामुळे हे ठिकाण खूपच भयानक वाटते. येथे रात्रीच्या वेळी विचित्र आवाज ऐकू येतात, असं अनेकांनी म्हटलं आहे. मात्र हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र तरीही लोक या ठिकाणी जाण्यास घाबरतात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.