AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये विषारी दारुने घेतले २५ बळी; ६० हून अधिक रुग्णालयात, हे कारण आलं समोर

Illicit Liquor Kallakurichi : देशातील विषारी दारुचे सत्र थांबलेले नाही. दक्षिणेत तामिळनाडूमध्ये तर यामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. राज्यातील कल्लाकुरिची येथे विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये विषारी दारुने घेतले २५ बळी; ६० हून अधिक रुग्णालयात, हे कारण आलं समोर
बनावट दारुने अनेकांची कुटुंब उघड्यावर
| Updated on: Jun 20, 2024 | 10:05 AM
Share

तामिळनाडूमध्ये विषारी दारुने अनेकांचा संसार उघड्यावर आणला. राज्यातील कल्लाकुरिची येथे विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाला. तर 60 हून अधिक जण गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून 200 लिटर विषारी दारू जप्त करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

कल्लाकुरिची शहरातील हद्दीत करुणापुरम हा भाग आहे. येथे मंगळवारी रात्री रोजंदारी कामगारांच्या एका गटाने दारु विकत घेतली. त्यानंतर विषारी दारुच्या बाधेने अनेकांना प्राण गमवावे लागले. अनेक जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरानंतर जिल्हाधिकारी एम एस प्रशांत यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या.

गुन्हेगारांची माहिती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

या घटनेची दखल मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी घेतली. गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यांवर आणि ही घटना रोखण्यासाठी अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच आश्वासन त्यांनी दिले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचे ते म्हणाले. अशा गुन्ह्यांमध्ये सामील गु्न्हेगारांविषयी माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांची माहिती दिल्यास या गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले.

बनावट दारुने संसार उघड्यावर

तामिळनाडूच्या विल्लुपूरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यांमध्ये बनावट दारुने अनेकांचे संसार उघड्यावर पडले. यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तर विल्लुपूरममधील एक्कियारकुप्पम गावात सहा जणांचा, मधुरंथागममध्ये दोघांचा आणि एका जोडप्याचा मृत्यू झाला. या घटनेने सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्यात बनावट दारुचे मोठे रॅकेट असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

हे कारण आले समोर

के. कन्नुकुट्टी याला प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या 200 लीटर अवैध दारुमध्ये घातक मिथेन आढळले आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी घटनेच्या सखोल तपासासाठी सीआयडी तपासाचे आदेश दिले आहेत.त्या दारूत मिथेनॉल मिसळले जात असल्याच तपासातून उघड झाले आहे.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....