AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये विषारी दारुने घेतले २५ बळी; ६० हून अधिक रुग्णालयात, हे कारण आलं समोर

Illicit Liquor Kallakurichi : देशातील विषारी दारुचे सत्र थांबलेले नाही. दक्षिणेत तामिळनाडूमध्ये तर यामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. राज्यातील कल्लाकुरिची येथे विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये विषारी दारुने घेतले २५ बळी; ६० हून अधिक रुग्णालयात, हे कारण आलं समोर
बनावट दारुने अनेकांची कुटुंब उघड्यावर
| Updated on: Jun 20, 2024 | 10:05 AM
Share

तामिळनाडूमध्ये विषारी दारुने अनेकांचा संसार उघड्यावर आणला. राज्यातील कल्लाकुरिची येथे विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाला. तर 60 हून अधिक जण गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून 200 लिटर विषारी दारू जप्त करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

कल्लाकुरिची शहरातील हद्दीत करुणापुरम हा भाग आहे. येथे मंगळवारी रात्री रोजंदारी कामगारांच्या एका गटाने दारु विकत घेतली. त्यानंतर विषारी दारुच्या बाधेने अनेकांना प्राण गमवावे लागले. अनेक जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरानंतर जिल्हाधिकारी एम एस प्रशांत यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या.

गुन्हेगारांची माहिती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

या घटनेची दखल मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी घेतली. गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यांवर आणि ही घटना रोखण्यासाठी अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच आश्वासन त्यांनी दिले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचे ते म्हणाले. अशा गुन्ह्यांमध्ये सामील गु्न्हेगारांविषयी माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांची माहिती दिल्यास या गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले.

बनावट दारुने संसार उघड्यावर

तामिळनाडूच्या विल्लुपूरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यांमध्ये बनावट दारुने अनेकांचे संसार उघड्यावर पडले. यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तर विल्लुपूरममधील एक्कियारकुप्पम गावात सहा जणांचा, मधुरंथागममध्ये दोघांचा आणि एका जोडप्याचा मृत्यू झाला. या घटनेने सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्यात बनावट दारुचे मोठे रॅकेट असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

हे कारण आले समोर

के. कन्नुकुट्टी याला प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या 200 लीटर अवैध दारुमध्ये घातक मिथेन आढळले आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी घटनेच्या सखोल तपासासाठी सीआयडी तपासाचे आदेश दिले आहेत.त्या दारूत मिथेनॉल मिसळले जात असल्याच तपासातून उघड झाले आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले