AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गावात बकरी पाळण्यास आहे सक्त मनाई, नेमके कारण काय ..?

आजही या गावाच्या संपूर्ण परिसरात कोणताही मेंढपाल राहु शकत नाही, की बकरी पाळू शकत नाही. काय आहे या गावाचे रहस्य...कोणत्या देवीने दिला या गावाला शाप...वाचा....

या गावात बकरी पाळण्यास आहे सक्त मनाई, नेमके कारण काय ..?
| Updated on: Sep 29, 2025 | 9:55 PM
Share

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात एक असे गाव आहे की जेथे बकरी पालन करणारे लोक राहू शकत नाहीत. या छतरपूर जिल्ह्यातील लवकुश नगरात ३०० वर्षांपूर्वी पाल समाजाला गावच्या देवीमातेने शाप दिला होता. ज्यामुळे आजही या गावात पाल समाजाचे कोणीही राहात नाही. लवकुश नगरातील रहिवासी सांगतात की सुमारे ३०० वर्षांपूर्वी जंगलातील डोंगरात एक गुराखी आपल्या बकऱ्यांनी चरण्यासाठी घेऊन गेला होता. त्याला डोंगरात एक छोटे कुंड दिसले. त्या कुंडाला लोक पाण्याने भरु शकत नव्हते. त्याने या कुंडाला नीट स्वच्छ केले आणि सर्वांसमोर त्याने घोषणा केली की तुम्ही लोक या कुंडाला पाण्याने भरु शकत नाही.पण मी या कुंडाला दूधाने भरेन…

गावकऱ्यांनी ही कथा सांगताना सांगितले की या मेंढपाळाने त्याच्या सर्व बकऱ्यांचे दूध या कुंडात टाकले. परंतू काही केल्या कुंड भरेना. त्याने त्याच्या नातेवाईकांच्या बकऱ्या देखील आणल्या आणि दूध कुंडात टाकले. परंतू कुंड काही भरेना. कुंडाचा हा चमत्कार सर्वत्र पसरला. ही चर्चा महाराज हिंदूपत यांच्या कानावरही आली. त्यानंतर राजा स्वत:हे चमत्कारिक कुंड पाहायला गेले. लोकांची या कुंडाबद्दल श्रद्धा निर्माण झाली आणि येते गावच्या मातेचे मंदिर स्थापन्न करण्यात आले. महाराज हिंदूपत यांना या मंदिराला पायऱ्या बनवल्या. येथील वयस्कर सांगतात की डोंगरातील कपारीत एक खड्डा आहे तो ९ इंच खोल आणि ४ इंच रुंद आहे.

इतिहासात मंदिराचा उल्लेख

इतिहासकार डॉ. काशी प्रसाद त्रिपाठी यांनी बुंदेलखंडाचा वृहद इतिहास सांगत स्वप्नात दृष्टांत झाल्याने तत्कालिन पन्ना महाराज हिंदूपत यांनी 1758-76 मध्ये चमत्कारीक कुंडाच्या स्थानी माता बंबरबेनीची निर्मिती केली.

मातेने दिला दृष्टांत

पुजारी बृजेश शर्मा यांनी सांगितले की कुंडात माँ सीता आपल्या कुशीत लव आणि कुश यांना घेताना दिसते. हे तेच चमत्कारिक कुंड आहे. ज्याला पाल समाजाच्या एका व्यक्तीने दूधाने भरण्याचा प्रयत्न केला होता. परंतू त्याच्या गर्विष्ठपणामुळे कुंड भरले नाही. माताने त्याच वेळी राजाच्या स्वप्नात दृष्टात दिला की माझ्या जवळपास किंवा माझ्या परिसरात पाल समाजाचा कोणीही व्यक्ती राहणार नाही. यानंतर येथून पाल समाजाचे लोक विस्थापित होऊ लागले. कारण त्यांना अडचणी येऊ लागल्या.

कायम राहल्याने येतात अडचणी

स्थानिक निवासी जगदीश नामदेव यांनी सांगितले की आजही या गावात कोणीही पाल समाजाचा व्यक्ती कायम स्वरुपी राहू शकत नाही. तसेच बकरीही पाळू शकत नाही. जर राहिला तर त्याला खूप कष्टप्रद जीवन जगावे लागते. त्याचा वंश वाढत नाही. त्यामुळे येथे पाल समाजाचे कोणी राहत नाही.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.