AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी 2 हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची भर! तर 40 रुग्णांचा 24 तासांत मृत्यू

India Corona Tally Latest Update: कोरोना रुग्णवाढीसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशात कोरोना रुग्णावाढीनं ही दोन हजार पेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं आहे.

Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी 2 हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची भर! तर 40 रुग्णांचा 24 तासांत मृत्यू
भारतात 2,380 कोरोना रूग्णांची नोंदImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 20, 2022 | 12:04 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना रुग्णवाढीसंदर्भात (Corona Update) महत्त्वाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशात कोरोना रुग्णावाढ (India Corona Tally) ही 2 हजार पेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं आहे. तर एकूण 40 कोरोना रुग्णांचा देशभरात गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. सध्या देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 4 कोटी 30 लाख 47 हजार 594 इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा 5 लाख 22 हजार 006 वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून (Health Ministry) ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. बुधवारी जारी करण्यात आलेल्या कोरोना रुग्णवाढीच्या आकडेवारीनुसार आता देशातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ही आता बारा हजारच्या पार गेली आहे. देशात सध्या 12,340 इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

रुग्णवाढीवर राजेश टोपेंनी काय म्हटलं?

दरम्यान, महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्रानं कोरोनाच्या रुग्णवाढीवर पत्र लिहिलंय. महाराष्ट्रातही अल्प प्रमाणात रुग्णवाढीची तेजी पाहायला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय, की वाढत असलेली कोरोना रुग्णवाढ चिंताजनक नाही. महाराष्ट्रानं हजारोंच्या संख्येनं होणारी रुग्णवाढही पाहली आहे. हाताळलीदेखील आहे. सध्याच्या घडीला वाढत असलेली रुग्णवाढ ही अल्प प्रमाणातही आहे. दरम्यान, रुग्णवाढीवरुन केंद्रानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केलं जाईल, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

पाहा व्हिडीओ :

उत्तरेत कोरोनाचा कहर!

दिल्ली एनसीआर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढीनं चिंता व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. मुंबईतही रुग्णवाढीचं प्रमाण लक्षणीय नसलं, तरीदेखील काळजी घेण्याचं आवाहनही केलं जातंय. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मास्कसक्ती होणार की काय, असाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जातोय.

गेल्या दोन दिवसांत दिल्ली आणि परिसरात कोरोना रुग्णवाढीनं वेग पकडला आहे. तिप्पट वेगानं रुग्णवाढ होत असल्यानं काळजी घेण्याचं आणि खबरदारी बाळगण्याचं आवाहनही केलं जातंय.

संबंधित बातम्या :

Longed Covid : कोरोना झालेल्या लोकांना आता या 20 आजारांचा धोका..! सरकार चिंता व्यक्त करत आहे, काळजी घ्या

ब्रेकिंग! महाराष्ट्र पुन्हा मास्कसक्ती होण्याची शक्यता, केंद्राचं महाराष्ट्रासह 5 राज्यांना पत्र, पत्रात काय?

Corona Cases : लहान मुलांना कोरोनाच्या नव्या लाटेचा मोठा धोका, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.