AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“युद्धासाठी तयार राहा, लवकरच…”, कारगिल विजय दिनी संरक्षणमंत्र्यांचा थेट पाकिस्तानला इशारा

Kargil Vijay Diwas 2023: कारगिल विजय दिवसाचं औचित्य साधत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी थेट पाकिस्तानला इशारा दिला आहे. लवकरच नियंत्रण रेषा पार केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

युद्धासाठी तयार राहा, लवकरच..., कारगिल विजय दिनी संरक्षणमंत्र्यांचा थेट पाकिस्तानला इशारा
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला भरला दम, "नियंत्रण रेखा लवकरच..."
| Updated on: Jul 26, 2023 | 4:51 PM
Share

मुंबई : कारगिल विजय दिवसाचं औचित्य साधत देशभरात वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही वीर जवानांच्या आठवणींना उजाला दिला आणि त्यांना नमन केलं. यावेळी त्यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते. “1999 मध्ये कारगिल युद्धात देशाच्या सैनिकांनी वीरतेचं प्रदर्शन केलं, शौर्य दाखवलं. हा इतिहास कायम सुवर्ण अक्षरात अधोरेखित असेल. मी त्या वीर जवानांना सलाम करतो आणि त्यांना श्रद्धांजली वाहतो. “, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आणि पाकव्याप्त काश्मीरबाबत भाष्य केलं. गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा पार करू शकतो असंही त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, “त्या वेळेस आम्ही नियंत्रण रेषा पार केली नाही. याचा अर्थ असा नाही की आम्ही एलओसी पार करू शकत नव्हतो. आम्ही एलओसी पार करू शकत होतो, पार करू शकतो आणि भविष्यात गरज पडली तर एलओसी पार करणार. मी देशातील नागरिकांना याबाबत विश्वास देऊ इच्छितो.”

तुम्हीही युद्धासाठी सज्ज राहा

“सध्या युद्धाचा कालावधी लांबत आहे. त्यामुळे भविष्यात देशातील नागरिकांना थेट युद्धात सहभागी होण्यासाठी सज्ज झालं पाहीजे. जनतेनं मानसिकरित्या यासाठी सक्षम होणं गरजेचं आहे. देशाला याची गरज असून सैनिकांच्या मदतीसाठी सज्ज राहणं आवश्यक आहे.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

पाकिस्तानने केली होती दगाबाजी

‘कारगिल युद्ध भारतावर लादलं गेलं होतं. भारत पाकिस्तानसोबत चर्चेनं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्यांनी पाठीत खंजीर खुपसलं. ऑपरेशन विजयच्या दरम्यान भारतीय सेनेने फक्त पाकिस्तानलाच नाही तर जगाला संदेश दिला. जेव्हा आमच्या देशहिताची बाब समोर येईल तेव्हा आमची सेना मागे हटणार नाही.’

शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान.
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद.
12 तारखेला विलीनीकरणाबाबत बोलेल; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
12 तारखेला विलीनीकरणाबाबत बोलेल; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं.
येत्या काळात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार;रोहित पवारांचं सूचक विधान
येत्या काळात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार;रोहित पवारांचं सूचक विधान.
आमदार विलास भुमरेंनी मतदानावेळी ईव्हीएम जवळ मुलालाही नेलं!
आमदार विलास भुमरेंनी मतदानावेळी ईव्हीएम जवळ मुलालाही नेलं!.
Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडेंची वर्णी!
Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडेंची वर्णी!.
नदीतूनच प्रवास... मतदार म्हणतात, रस्ता नाही, तर मत नाही
नदीतूनच प्रवास... मतदार म्हणतात, रस्ता नाही, तर मत नाही.
मुंबईच्या उपमहापौरपदाचा मान शिंदेंच्या सेनेकडे! संजय घाडी यांची निवड
मुंबईच्या उपमहापौरपदाचा मान शिंदेंच्या सेनेकडे! संजय घाडी यांची निवड.
मुंबईतील भाजपचे नगरसेवक पक्ष कार्यालयात दाखल
मुंबईतील भाजपचे नगरसेवक पक्ष कार्यालयात दाखल.
अकलूजच्या मतदान केंद्रावर लहान मुलाने ईव्हीएमचं बटण दाबलं!
अकलूजच्या मतदान केंद्रावर लहान मुलाने ईव्हीएमचं बटण दाबलं!.