AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“युद्धासाठी तयार राहा, लवकरच…”, कारगिल विजय दिनी संरक्षणमंत्र्यांचा थेट पाकिस्तानला इशारा

Kargil Vijay Diwas 2023: कारगिल विजय दिवसाचं औचित्य साधत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी थेट पाकिस्तानला इशारा दिला आहे. लवकरच नियंत्रण रेषा पार केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

युद्धासाठी तयार राहा, लवकरच..., कारगिल विजय दिनी संरक्षणमंत्र्यांचा थेट पाकिस्तानला इशारा
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला भरला दम, "नियंत्रण रेखा लवकरच..."
| Updated on: Jul 26, 2023 | 4:51 PM
Share

मुंबई : कारगिल विजय दिवसाचं औचित्य साधत देशभरात वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही वीर जवानांच्या आठवणींना उजाला दिला आणि त्यांना नमन केलं. यावेळी त्यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते. “1999 मध्ये कारगिल युद्धात देशाच्या सैनिकांनी वीरतेचं प्रदर्शन केलं, शौर्य दाखवलं. हा इतिहास कायम सुवर्ण अक्षरात अधोरेखित असेल. मी त्या वीर जवानांना सलाम करतो आणि त्यांना श्रद्धांजली वाहतो. “, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आणि पाकव्याप्त काश्मीरबाबत भाष्य केलं. गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा पार करू शकतो असंही त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, “त्या वेळेस आम्ही नियंत्रण रेषा पार केली नाही. याचा अर्थ असा नाही की आम्ही एलओसी पार करू शकत नव्हतो. आम्ही एलओसी पार करू शकत होतो, पार करू शकतो आणि भविष्यात गरज पडली तर एलओसी पार करणार. मी देशातील नागरिकांना याबाबत विश्वास देऊ इच्छितो.”

तुम्हीही युद्धासाठी सज्ज राहा

“सध्या युद्धाचा कालावधी लांबत आहे. त्यामुळे भविष्यात देशातील नागरिकांना थेट युद्धात सहभागी होण्यासाठी सज्ज झालं पाहीजे. जनतेनं मानसिकरित्या यासाठी सक्षम होणं गरजेचं आहे. देशाला याची गरज असून सैनिकांच्या मदतीसाठी सज्ज राहणं आवश्यक आहे.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

पाकिस्तानने केली होती दगाबाजी

‘कारगिल युद्ध भारतावर लादलं गेलं होतं. भारत पाकिस्तानसोबत चर्चेनं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्यांनी पाठीत खंजीर खुपसलं. ऑपरेशन विजयच्या दरम्यान भारतीय सेनेने फक्त पाकिस्तानलाच नाही तर जगाला संदेश दिला. जेव्हा आमच्या देशहिताची बाब समोर येईल तेव्हा आमची सेना मागे हटणार नाही.’

Follow Us
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी