AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा पाकिस्तानला दुहेरी दणका, ‘त्या’ एका फोनमुळे उडाली पाकची झोप

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू नदी जल वाटप करार स्थगित करून पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यानंतर भारतानं आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे.

भारताचा पाकिस्तानला दुहेरी दणका, 'त्या' एका फोनमुळे उडाली पाकची झोप
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 16, 2025 | 7:54 PM
Share

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू नदी जल वाटप करार स्थगित करून पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र भारत आता पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अफगानिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी यांचं गुरुवारी फोनवर बोलणं झालं. मात्र या फोनमुळे आता पाकिस्तानची झोप उडाली आहे. त्याला कारण देखील तसंच आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयशंकर आणि मुत्ताकी यांनी भारताच्या मदतीनं अफगाणिस्तामध्ये सुरू असलेले प्रकल्प पुढे नेण्यास सहमती दर्शविली आहे. या विकास प्रकल्पांमध्ये काबूल नदीवर बांधण्यात येणाऱ्या शहतूत धरण प्रकल्पाचा देखील समावेश आहे. 2021 लाच या संदर्भात भारत आणि अफगाणिस्तानमध्ये एक करार झाला होता, मात्र अफगाणिस्तानमध्ये झालेल्या सत्ताबदलानंतर या कराराला ब्रेक लागला होता.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा आता या करारावर चर्चा सुरू झाली आहे.काबूल नदीवर हे धरण बांधण्यात येणार आहे, या प्रकल्पासाठी भारत अफगाणिस्तानला 236 मिलियन डॉलर रुपयांची मदत करणार आहे, तसेच तांत्रिक मदत देखील पुरवणार आहे. तीन वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज आहे. या प्रकल्पामुळे काबूल आणि परिसरात राहणाऱ्या तब्बल 20 लाख लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणार आहे, तसेच अफगाणिस्तानची तब्बल चार हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, मात्र हे धरण अफगाणिस्तामध्ये झालं तर दुसरीकडे पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये दुष्काळ पडू शकतो. खैबर पख्तूनख्वामध्ये जाणारं सर्व पाणी या धरणामुळे अडवलं जाणार आहे.

तर दुसरीकडे भारतानं सिंधू पाणी वाटप करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील सुमारे 80 टक्के शेती ही सिंधू नदीच्या पाण्यावर अंवलंबू आहे. अशा पद्धतीने आता भारत पाकिस्तानची दुहेरी कोंडी करू शकतो. सिंधू  पाणी वाटप करार स्थगिताचा पुनर्विचार करावा यासाठी पाकिस्तानकडून भारताला एक पत्र देखील पाठवण्यात आलं आहे. करार स्थगिताचा पुनर्विचार करावा अशी विनंती करण्यात आली आहे.

Follow Us
लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी..
Ladki Bahin | लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी छाननी
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
Jejuri Vari Accident | भंडाऱ्याच्या उत्साहात काळाचा घाला! जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
Buldhana | बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! सह्याद्री-अजिंठा पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन