AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे प्रवाशांना झटका, तिकीट कॅन्सल केल्यास खिशाला बसणार मोठा फटका; किती पैसे कापले जाणार?

भारतीय रेल्वेने १ एप्रिल २०२६ पासून तिकीट रद्द करण्याच्या नियमांत बदल केले आहेत. आता ८ तास आधी तिकीट रद्द केल्यास परतावा मिळणार नाही, तर डिजिटल बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा उपलब्ध होईल.

रेल्वे प्रवाशांना झटका, तिकीट कॅन्सल केल्यास खिशाला बसणार मोठा फटका; किती पैसे कापले जाणार?
indian railways
| Updated on: Mar 31, 2026 | 9:02 AM
Share

भारतीय रेल्वेने प्रवासी सेवा अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी तिकीट आरक्षण आणि परतावा नियमावलीमध्ये ऐतिहासिक बदल केले आहेत. येत्या १ एप्रिल २०२६ पासून नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रवासाचे नियोजन अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी आणि तिकीट काळाबाजाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने तिकीट रद्द करण्याच्या वेळेत आणि कपातीच्या दरात मोठे बदल केले आहेत. या नवीन नियमांमुळे प्रवाशांना काही प्रमाणात आर्थिक फटका बसणार असला, तरी प्रवासादरम्यान मिळणाऱ्या सुविधांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

नवीन नियम काय?

भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने तिकीट रद्द करण्याच्या वेळेनुसार परतावा कपातीचे नवे निकष ठरवले आहेत. या बदलांमुळे शेवटच्या क्षणी तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. जर एखादा प्रवासी गाडी सुटण्याच्या ८ तास आधी तिकीट रद्द करत असेल, तर त्याला तिकिटाचा एकही रुपया परत मिळणार नाही. यापूर्वी ही मर्यादा ४ तासांची होती, ती आता वाढवण्यात आली आहे.

गाडी सुटण्यापूर्वी ८ ते २४ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास एकूण भाड्याच्या ५० टक्के रक्कम प्रशासनाकडून कापली जाईल. यानंतर २४ ते ७२ तास आधी आरक्षण रद्द केल्यास २५ टक्के रक्कम कपात केली जाईल. तसेच ७२ तासांच्या आधी तिकीट रद्द केल्यास केवळ नियमानुसार किमान लिपिकीय शुल्क (Clerkage Charges) आकारले जाईल.

प्रवासादरम्यान आपले सीट अपग्रेड करता येणार

त्यासोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने तांत्रिक सुधारणा केली आहे. आता प्रवासी आपले बोर्डिंग स्टेशन (प्रवास सुरू करण्याचे ठिकाण) गाडी सुटण्याच्या ३० मिनिटे आधीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने बदलू शकणार आहेत. या सुविधेमुळे प्रवाशांना शेवटच्या क्षणी दुसऱ्या स्टेशनवरून गाडी पकडणे शक्य होईल. जर ट्रेनमध्ये वरच्या वर्गातील (उदा. स्लीपरमधून थ्री-टायर एसी किंवा टू-टायर एसी) जागा रिकाम्या राहिल्या असतील, तर प्रवाशांना आता प्रवासादरम्यान आपले सीट अपग्रेड करण्याची संधी मिळेल. यासाठी टीटीई (TTE) कडे जाऊन किंवा रेल्वेच्या अधिकृत ॲपवरून अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा घेता येईल.

नो रिफंडची मर्यादा वाढवली

ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांना मोठा दिलासा देत रेल्वेने ‘युनिव्हर्सल कॅन्सलेशन’ सुविधा सुरू केली आहे. आता प्रवासी आपले खिडकीवरून काढलेले तिकीट (Counter Ticket) देशातील कोणत्याही रेल्वे स्टेशनवरून रद्द करू शकतात आणि तिथूनच आपला परतावा मिळवू शकतात. यापूर्वी तिकीट काढलेल्या किंवा बोर्डिंग स्टेशनवरूनच तिकीट रद्द करावे लागत असे.

रेल्वे प्रशासनाच्या मते, या बदलांमुळे तिकीट दलालांवर वचक बसेल आणि ऐनवेळी प्रवास रद्द करणाऱ्यांच्या जागी गरजूंना तात्काळ कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होईल. तसेच डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी नो रिफंडची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.