AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धावेळी भारताचा दुसरा बळी, आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू

रशिया-युक्रेन युद्धात भारताचा दुसरा बळी गेलाय. कारण आता आलेल्या बातमीनुसार आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कालच एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने देश हळहळ व्यक्त करत होता.

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धावेळी भारताचा दुसरा बळी, आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू
आजारपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यूImage Credit source: PTI
| Updated on: Mar 02, 2022 | 5:14 PM
Share

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धात भारताचा दुसरा (Indian Students In Ukraine) बळी गेलाय. कारण आता आलेल्या बातमीनुसार आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू (Indian Student Death In Ukraine) झाल्याची माहिती समोर आली आहे. तो आजारी होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर कालच गोळीबारात (Firing) एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने देश हळहळ व्यक्त करत होता. त्यात आज पुन्हा एक विद्यार्थी गमावल्याने चिंतेचे वातावरण पसले आहे. रशिया युक्रेन युद्धात अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. हा विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर काल मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांवर रशियन सैन्याचा गोळीबार झाला होता. आज मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. भारतीय विद्यार्थी जमेल त्या परीने सध्या युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत.

रशियाचे सतत हल्ले सुरू

त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे. युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनियन सैन्याकडून सतत गोळीबाबत, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत. यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. यात अनेक युक्रेनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. या युद्धाची मोठी झळ भारतालाही बसत असल्याचे दिसून येत आहे.  यात अनेक देशातील लोक अडकले आहेत. अमेरिकेने ठणकावूणही रशिया सर्व विरोध झुगारून युक्रेनवर रोज जोरदार हल्ले चढवत आहे.

परतीचे युद्धपातळीवर प्रयत्न

अनेक भारतीयांची मुलं नातेवाईक युक्रेनमध्ये अडकल्याने सध्या भारतातही चिंतेचे वातावरण आहे. या विद्यार्थ्यांना परत भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारनेही हलाचाली वाढवल्या आहेत. मात्र युद्धामुळे काही मोठे अडथळे येत आहेत. तरीही अनेक विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणण्यात आपल्यालं यश आले आहे. मात्र अजूनही मोठ्या संख्येने विद्यार्थी अडकल्याचे सांगण्यात येत आहे. यांना लवकरात लवकर परत आणा अशी मागणी यांच्या पालकांकडून करण्यात येत आहे. भारतीय विद्यार्थी अडकल्याने सारा देश सध्या हळहळ व्यक्त करत आहेत. काल एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर मोदींनी दिल्लीत तातडीची बैठक घेत परिस्थितीचा आढाव घेतला आहे. युद्धपातळीवर या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे.

Russia Ukraine War politics: झेलेन्सिकीला घालवून पुतीनना यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण हवंय? एका नावाची जोरदार चर्चा

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धावेळी भारताचा दुसरा बळी, आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू

Russia Ukrane War : युक्रेनच्या “भुतानं” रशियाला झपाटलं, रशियाच्या 6 फाइटर जेटचा केला भुगा

Follow Us
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.