AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संघाच्या आणि आदित्य बिर्ला ग्रुपच्या कार्यात अनेक समानता, कुमार मंगलम बिर्ला यांनी केले संघाचे तोंडभरून कौतुक

आदित्य बिरला ग्रुप आणि संघाच्या कार्यात अनेक समानता आहेत. शिक्षण, समाजसेवा यात आम्ही मोठ्या प्रमाणात काम करून योगदान देत असतो, असे कुमार मंगलम बिर्ला म्हणाले.

संघाच्या आणि आदित्य बिर्ला ग्रुपच्या कार्यात अनेक समानता, कुमार मंगलम बिर्ला यांनी केले संघाचे तोंडभरून कौतुक
rss and kumar mangalam birlaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 04, 2026 | 9:47 PM
Share

Kumar Mangalam Birla : देशातील प्रसिद्ध उद्योजक कुमार मंगलम बिरला यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तोंडभरून कौतुक केले. गुरुवारी (4 जून) नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाल संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. आदित्य बिरला ग्रुप आणि संघाच्या कार्यात अनेक समानता आहेत, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. संघाने स्थापनेची 100 वर्षे पूर्ण केली हा काळ काही थोडा नाही. संघ समाजकार्यासाठी कायम उभा राहिलेला आहे, असेही यावेळी कुमार मंगलम बिर्ला म्हणाले.

सरसंघचालकांचे विचार, त्यांचं ध्येय आणि त्यांचं काम बघून मी प्रभावित झालो आहे. संघाच्या आज एवढ्या मोठ्या प्रमाणात शाखा आहेत. स्वातंत्रपूर्व काळापासून आजपर्यंत अनेक संकटांच्या काळात संघ समाजकार्य करण्यासाठी उभा राहिलेला आहे. संघाने 100 वर्ष पूर्ण केलेले आहेत. हा काही थोडा काळ नाही, अशा शब्दांत त्यांनी संघाची स्तुती केली. तसेच, पंतप्रधान अमृतकालाबद्दल बोलत असतात. भारताचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. आता हा भारताचा काळ आहे. कच्चा तेलाच्या किमतीमध्ये अनेकदा चढ-उतार होत राहिला आहे, असेही यावेळी कुमार मंगलम बिरला म्हणाले.

एआय आता आमच्या दरवाजावर आहे. भारतासाठी हा आव्हानाचा काळ आहे. मात्र भारत आता अमृतकाळात आहे. भारतात विकास होत आहे. आमच्या एका कंपनीची सुरवात स्वातंत्र्याच्या कळात झाली. माझे पणजोब त्या काळात कॉटन व्यवसाय करत होते. मात्र त्यात त्यांना विकास करायचा होता. त्यात त्यांनी बदल केला आणि व्यवसाय वाढविला. आदित्य बिरला ग्रुप आणि संघाच्या कार्यात अनेक समानता आहेत. शिक्षण, समाजसेवा यात आम्ही मोठ्या प्रमाणात काम करून योगदान देत असतो, असे कुमार मंगलम बिर्ला म्हणाले.

आमच्या शाळा आणि कॉलेजमध्ये व्यक्तित्व विकासाला महत्त्व दिले जाते. उद्योगाने देशाचा विकास होत असतो. नेशन बिल्डिंग हा आमच्या परिवारातील महत्वाचा विषय आहे आणि आम्ही त्यावर काम करतो. मजबूत उद्योगाच्या सुरवातीने राष्ट्र सावरत असत त्यातून विकास होत आहे. पाण्यानंतर सगळ्यात जास्त सिमेंट लागते. समाजाला जोडणारे रस्ते, शाळा, घर सगळं सिमेंटने बनत असते. मेट्रो, रेलमध्ये काम मोठ्या प्रमाणात होत आहे. आमच्या सिमेंट कंपनीची क्षमता खूप वाढली आहे. ही कंपनी जगातील सगळ्यात मोठी सिमेंट कंपनी आहे, असे कुमार मंगलम बिर्ला यांनी आवर्जुन सांगितले.

आमच्या फायनान्स कंपनीची कर्ज देण्याची क्षमता 2 हजार कोटी रुपयांर्यंत पोहचली. आमची कंपनी सामान्यांना कर्ज देते. विकसित भारताच स्वप्न मोठं आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या कंपन्या आवश्यक आहेत. युवकांनो भारतात काम करा, भारतासाठी काम करा, भारतात राहून काम करा, असे आवाहनही त्यांनी केले. हे युग भारताचे आहे. या आधी असा वेळ नव्हता. आता ती वेळ आली आहे. युवकांनो रोजगार निर्माण करा, स्टार्टअप सुरू करा, असेही आवाहन कुमार मंगलम बिर्ला यांनी केले. मी आज दिवस भर संघ कसं काम करतो ते बघितलं संघाचा काम देशाला पुढे नेण्यासाठी सुरु आहे, असेही शेवटी त्यांनी आवर्जून सांगितले.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत