Iran-Israel War : सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?
इराण-इस्रायल संघर्षामुळे भारतातील बाटलीबंद पाण्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. युद्धामुळे तेलाच्या किमती वाढल्याने प्लास्टिक बाटल्यांसाठी लागणाऱ्या पॉलिमरची किंमत 50% पर्यंत वाढली आहे. यामुळे उन्हाळ्यात वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी बाटलीबंद पाण्याची दरवाढ अटळ मानली जात आहे, ज्याचा परिणाम ५ अब्ज डॉलरच्या भारतीय बाजारावर होईल.

धगधगता उन्हाळ्याने जीवाची काहिली होत्ये. अशा वातावरणात तहान तहान होते, सारखं पाणी प्यायलं जातं. आपण बाहेर असून तर पाणी विकत घेतलं जातं. याच सीझनमध्ये रेल्वे स्थानकं, मेट्रो स्टेशन , बस स्टँड, पानाचं दुकान, हॉटेल आणि इतर ठिकाणी बाटलीबंद पाण्याची मागणी वाढताना दिसते. पण आता उन्हाळ्यापूर्वीच सुरू झालेल्या इराण आणि अमेरिका-इस्रायल युद्धांमुळे विविध व्यवसायांवर परिणाम झाला. पाण्याच्या बाटलीच्या उद्योगावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. भारतातील बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ अंदाजे 5 अब्ज डॉलर्सच्या किमतीची आहे आणि युद्धाचा त्यावर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. या उद्योगातील सूत्रांचा हवाला देऊन रॉयटर्सने असा दावा केला आहे की युद्धामुळे भारतात बाटलीबंद पाण्याच्या किमती वाढू शकतात.
खरं तर, या युद्धामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांपासून ते लेबल आणि कार्डबोर्ड बॉक्सपर्यंत अनेक वस्तूंच्या किमती वाढल्याचे म्हटले जाते. भारत हा जगातील सर्वात मोठ्या बाटलीबंद पाण्याच्या बाजारपेठांपैकी एक असून त्यामुळे बाटलीच्या किमतीत कोणताही बदल झाल्यास किरकोळ बाजारावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. मात्र अजून तरी रकोळ बाजारावर कोणताही परिणाम झालेला नाही.
का वाढणार किमती ?
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, ऑल इंडिया पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या फेडरेशनचं असं म्हणणं आहे की, तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पॉलिमरची किंमत वाढली आहे. जे कच्च्या तेलापासून बनवल जातं आणि तो प्लास्टिकच्या बाटल्यांच्या उद्योगातील उत्पादनात एक महत्त्वाचा घटक आहेत. प्लास्टिकच्या बाटल्या बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची किंमत 50 % ने वाढून प्रति किलोग्रामसाठी 170 रुपये इतकी झाली आहे. तर बाटलीच्या झाकणांची किंमत ही दुप्पटीपेक्षा जास्त वाढून 0.45 रुपये प्रति नग इतकी झाली आहे. तसेच corrugated boxes, लेबल्स आणि चिकटवण्यासाठी वापरण्यात येणारी टेप देखील प्रचंड महाग झाली आहे.
गुजरातच्या युनिट्सवर परिणाम
एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, भारतातील एकूण प्लास्टिक उत्पादनापैकी गुजरातमधील प्लास्टिक उत्पादन क्षेत्राचा वाटा अंदाजे 35 ते 40 टक्के आहेत. तिथे आहे. येथे १०,००० हून अधिक युनिट्स आहेत. इस्रायल-इराण संघर्षानंतर पॉलिमरच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीचा या प्रदेशावर गंभीर परिणाम झाला आहे. उद्योग क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे की केवळ १२ दिवसांत पीईटी पॉलिमरच्या किमती अंदाजे ४०% वाढल्या आहेत. उन्हाळ्यात पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढत असल्याने उत्पादनावर दबाव वाढला आहे.
टाइम्स ऑफ इंडिया की रिपोर्ट के मुताबिक,गुजरात का प्लास्टिक मैन्युफैक्चरिंग सेक्टर भारत के कुल प्लास्टिक उत्पादन का लगभग 35% से 40% हिस्सा बनाता है. तिथे 10 हजारपेक्षा जास्त युनिट्स आहेत. इस्रायल-इराण संघर्षानंतर पॉलिमरच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीचा देशावर मोठा परिणाम झाला आहे. उद्योग क्षेत्रातील जाणकारांच्या सांगण्यानुसार, फक्त 12 दिवसांत पीईटी पॉलिमरच्या किमती जवळपास 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. उन्हाळ्यात पाण्याच्या पॅकेज्ड बाटल्यांची मागणी वाढत असल्याने उत्पादनावर दबाव वाढला आहे. गुजरात स्टेट प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (GSPMA) नुसार, विविध उत्पादनांमधील पॉलिमरच्या किमती वाढून प्रति किलो 18 रुपयांवरून आता 32 रुपयांवर पोहोचल्या आहेत. ज्यामुळे लहान उत्पादकांवर दबाव आला आहे जे आता ऑर्डर पूर्ण करण्यास सक्षम नाहीत.
