AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान इतकी वर्षे लागतील, सरकारी अधिकाऱ्याचा दाव्याने वाढले टेन्शन

इराण युद्धामुळे भारतातील इंधनसाठा विस्कळीत झाला आहे. देशातील एलपीजी पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी अजून चार वर्षांचा वेळ लागू शकतो. मात्र, या वृत्ताला सरकारने दुजोरा दिलेला नाही.

LPG पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान इतकी वर्षे लागतील, सरकारी अधिकाऱ्याचा दाव्याने वाढले टेन्शन
gas cylinder
| Updated on: Apr 16, 2026 | 6:42 PM
Share

इराण- अमेरिका दरम्यान युद्धानंतर भारतातील पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठा साखळीवर मोठा वाईट परिणाम झाला आहे. आता भारतातील लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजीचा पुरवठा बहाल होण्यास सुमारे चार वर्षांचा कालावधी लागून शकतो असे म्हटले जात आहे. ही बाब एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितली आहे. मात्र, यावर सरकारकडून एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेल पुरवठा विना व्यत्यय सुरु करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंग्रजी वेबसाईट मनी कंट्रोलशी बोलताना सांगितले की सरकारचे पूर्ण लक्ष सध्या एलपीजी आणि क्रुड ऑईलचा पुरवठ्यावर आहे. प्रयत्न हा केला जात आहे की सर्व घरांपर्यंत एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा कायम रहावा आणि कोणीतीही कमतरता असेल तर लागलीच दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

बंद झाले जास्त गरजेचे स्रोत- अधिकारी

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की प्रभावित सप्लायर्सकडून सरकार सतत पाठपुरावा करुन माहिती घेत आहे. याच माहितीच्या आधारावर आम्ही हे सांगू शकतो की एलपीजीचा पुरवठा आधी सारखा सुरळीत होण्यासाठी आता तीन ते चार वर्षे लागू शकतात वा त्याहून अधिक काळ लागू शकतो. अधिकारी पुढे म्हणाला की खूप गरजेचे पुरवठा स्रोत बंद झाले आहेत, यामुळे ही अडचण वाढत आहे.

स्रोत बंद होण्याचा अर्थ होण्याचा अर्थ अजून स्पष्ट झालेला नाही की संपूर्ण विहिरी रिकाम्या झाल्या आहेत की त्या विहिरीचे उत्पादन थांबलेले आहे ? सप्लायर्स स्वत:च सांगत आहेत की स्थिती सुधारण्यास तीन वर्षे तरी लागतील.

अस्थिरतेमुळे पुरवठ्यात मोठा अडथळा –

२७ फेब्रुवारी रोजी इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केला. त्यानंतर भारतात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्या संदर्भात संकट निर्माण झाले होते, जे अजूनही सुरु आहे. आता इराणमध्ये सीझफायर लागू आहे. मात्र होर्मुझवरुन सातत्याने वाद सुरु आहेत.याच अस्थितरतेमुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर धोका कायम आहे. होर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गातून अजूनही भारताला सुमारे ९० टक्के एलपीजी पुरवठा होतो.

Follow Us
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत.