AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान इतकी वर्षे लागतील, सरकारी अधिकाऱ्याचा दाव्याने वाढले टेन्शन

इराण युद्धामुळे भारतातील इंधनसाठा विस्कळीत झाला आहे. देशातील एलपीजी पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी अजून चार वर्षांचा वेळ लागू शकतो. मात्र, या वृत्ताला सरकारने दुजोरा दिलेला नाही.

LPG पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान इतकी वर्षे लागतील, सरकारी अधिकाऱ्याचा दाव्याने वाढले टेन्शन
gas cylinder
| Updated on: Apr 16, 2026 | 6:42 PM
Share

इराण- अमेरिका दरम्यान युद्धानंतर भारतातील पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठा साखळीवर मोठा वाईट परिणाम झाला आहे. आता भारतातील लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजीचा पुरवठा बहाल होण्यास सुमारे चार वर्षांचा कालावधी लागून शकतो असे म्हटले जात आहे. ही बाब एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितली आहे. मात्र, यावर सरकारकडून एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेल पुरवठा विना व्यत्यय सुरु करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंग्रजी वेबसाईट मनी कंट्रोलशी बोलताना सांगितले की सरकारचे पूर्ण लक्ष सध्या एलपीजी आणि क्रुड ऑईलचा पुरवठ्यावर आहे. प्रयत्न हा केला जात आहे की सर्व घरांपर्यंत एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा कायम रहावा आणि कोणीतीही कमतरता असेल तर लागलीच दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

बंद झाले जास्त गरजेचे स्रोत- अधिकारी

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की प्रभावित सप्लायर्सकडून सरकार सतत पाठपुरावा करुन माहिती घेत आहे. याच माहितीच्या आधारावर आम्ही हे सांगू शकतो की एलपीजीचा पुरवठा आधी सारखा सुरळीत होण्यासाठी आता तीन ते चार वर्षे लागू शकतात वा त्याहून अधिक काळ लागू शकतो. अधिकारी पुढे म्हणाला की खूप गरजेचे पुरवठा स्रोत बंद झाले आहेत, यामुळे ही अडचण वाढत आहे.

स्रोत बंद होण्याचा अर्थ होण्याचा अर्थ अजून स्पष्ट झालेला नाही की संपूर्ण विहिरी रिकाम्या झाल्या आहेत की त्या विहिरीचे उत्पादन थांबलेले आहे ? सप्लायर्स स्वत:च सांगत आहेत की स्थिती सुधारण्यास तीन वर्षे तरी लागतील.

अस्थिरतेमुळे पुरवठ्यात मोठा अडथळा –

२७ फेब्रुवारी रोजी इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केला. त्यानंतर भारतात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्या संदर्भात संकट निर्माण झाले होते, जे अजूनही सुरु आहे. आता इराणमध्ये सीझफायर लागू आहे. मात्र होर्मुझवरुन सातत्याने वाद सुरु आहेत.याच अस्थितरतेमुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर धोका कायम आहे. होर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गातून अजूनही भारताला सुमारे ९० टक्के एलपीजी पुरवठा होतो.

Follow Us
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी.....
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं.......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं........
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....