AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्र सरताच दिवसा तरंगायला लागले मृतदेह, भूतनाथ तलावात भयंकर प्रकार; 5 दिवसापूर्वी घडलं असं काही की… लोकांमध्ये एकच भीती!

भूतनाथ तलावात भयंकर प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृतदेह तलावात आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रात्र सरताच दिवसा तरंगायला लागले मृतदेह, भूतनाथ तलावात भयंकर प्रकार; 5 दिवसापूर्वी घडलं असं काही की… लोकांमध्ये एकच भीती!
karnataka shocking news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 8:42 AM
Share

भूषण पाटील : कर्नाटकातून धक्कादायक घटना समोर आली आहे. विजयपुरा शहराशेजारील भूतनाथ तलावात एकाच कुटुंबातील 6 सदस्यांचे मृतदेह आढळल्याचे उघडकीस आले. यात एक महिला आणि तिच्या पाच मुलांचा समावेश आहे. हे सर्व गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील विजयपुर शहराशेजारील ऐतिहासिक भूतनाथ तलावात महिलेने आपल्या तीन मुलींसह दोन मुलांना घेऊन आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. पतीशी झालेल्या वादातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. विजयपूर तालुक्यातील तोरवी गावातील शोभा जालगिरे या आपल्या मुलांसह 24 ऑगस्ट पासून बेपत्ता होत्या. काल सकाळी विजयपूरमधील भूतनाथ तलावात काही मृतदेह तरंगत असल्याचं स्थानिकांना निदर्शनाला आलं. सुरुवातीला तलावात पोहोण्यासाठी गेले असता मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात होता. मात्र तपासादरम्यान शोभा यांनी पतीशी झालेल्या भांडणाच्या रागातून आपल्या तीन मुलींसह दोन मुलांना घेऊन ही आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पोलिसांना होता घातपाताचा संशय

कुटुंबातील सहा जणांच्या मृत्यूने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सर्व जण फिरण्यासाठी तलावाजवळ गेल्यानंतर कुणीतरी पाय घसरून तलावात पडले असावे. त्यानंतर एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करताना कुटुंबातील सहा जण बुडाले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांना घातपाताचाही संशय होता. परंतु तपासानंतर कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आलं आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले होते घटनास्थळी

पोलीस अधिकाऱ्याने घटनास्थळी पोहोचल्यानंतर सांगितले होते की, तलावात मृतदेह सापडल्यानंतर तातडीने आमच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेऊन पंचनामा केला. त्यानंतर तलावातील सर्व मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. सर्व कुटुंबीय तलावात कसे पोहोचले, याचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या सीसीटीव्हीचा तपास करण्यात येत आहे.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश