AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीषण अग्नितांडव… 15 तासांनंतरही आग अनियंत्रित… 8 जणांचा मृत्यू तर, 20 बेपत्ता

कारखाना आणि डेकोरेटर गोदामला लागलेल्या आगीमुळे 8 जाणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 20 जण अद्याप बेपत्ता आहेत... कारखाण्यात असेल्या ज्वलशील पदार्थांमुळे आगीने रौद्र रुप घेतलं... अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

भीषण अग्नितांडव... 15 तासांनंतरही आग अनियंत्रित... 8 जणांचा मृत्यू तर, 20 बेपत्ता
fire at warehouse
| Updated on: Jan 27, 2026 | 9:08 AM
Share

प्रजासत्ताक दिनाची सकाळ अत्यंत भयानक ठरली. कारखाना आणि डेकोरेटर गोदामला लागलेल्या आगीने काही तासांत भीषण रुप घेतलं. गेल्या 15 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण आग नियंत्रणात आली नसल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अग्नीतांडवमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण बेपत्ता आहे… बेपत्ता लोकांचे नातेवाईक आता पोलिसांत तक्रार दाखल करत आहेत. ही भीषण आग कोलकात्याच्या दक्षिणेकडील बाहेरील आनंदपूर येथील एका सुक्या अन्नाच्या गोदामात सोमवारी पहाटे लागल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी बारा अग्निशमन दलाच्या गाड्या अथक परिश्रम घेत आहेत. गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ असल्याने आग वेगाने पसरली.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आग इतकी भीषण होती की आत अडकलेल्या लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सापडलेले मृतदेह इतके जळालेले आहेत की त्यांची ओळख पटवणे सध्या अशक्य आहे. ढिगारा साफ करण्यासाठी जेसीबी मशीन आणि रोबोटिक कॅमेरे वापरले जात आहेत.

बेपत्ता कर्मचारी पंकज हलदार यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 3:30 वाजता पंकजने फोनवरून सांगितले होतं की, “कारखान्याचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद आहे आणि आम्ही भिंत तोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत.”

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मोमो फॅक्टरीसह गोदामात देखील रात्रीच्या शिफ्टचं काम सुरू होतं. सोमवारी मध्यरात्री जवळपास 3 वाजेपर्यंत काम सुरु होता. कारखान्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या पाम तेल आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमुळे आग अधिक भडकली, ज्यामुळे स्फोट झाले आणि आग लागली. अरुंद रस्ते आणि दाट धुरामुळे बचाव कार्यात लक्षणीय अडथळा येत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

मध्यरात्री लागलेली आगीवर सकाळी 11 वाजेपर्यंत नियंत्रण मिळवण्यात आलं. पण अद्यापही काही ठिकाणी आग लागलेली असून विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री अरुप बिस्वास यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतांच्या कुटुंबियांना सांत्वन दिलं. त्यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला आणि बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबियांशी देखील संवाद साधला.

आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.