AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाबनंतर दिल्लीमध्ये काँग्रेसला मोठा झटका, इंडिया आघाडीचे काय होणार?

Loksabha election 2024: आम आदमी पक्षाने काँग्रेसला अशई ऑफर दिली आहे जी काँग्रेस कधीच स्वीकार करणार नाही. एकप्रकारे आपने काँग्रेसला कमी पण दाखवला आहे. काँग्रेस पक्षाला यामुळे आणखी एक धक्का बसला आहे. कारण यामुळे आता इंडिया आघाडीतून आणखी एक पक्ष बाहेर पडणार आहे हे निश्चित आहे.

पंजाबनंतर दिल्लीमध्ये काँग्रेसला मोठा झटका, इंडिया आघाडीचे काय होणार?
| Updated on: Feb 13, 2024 | 4:49 PM
Share

AAP offer Congress : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत सतत फूट पडत असल्याचं दिसत आहे. एकामागून एक राजकीय पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडताना दिसत आहेत. आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मग नितीश कुमार आणि आरएलडीनंतर आम आदमी पार्टीनेही मोठी घोषणा केली आहे. आम आदमी पक्षानेही काँग्रेसला जागावाटपाची ऑफर दिली आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाने काँग्रेसला लोकसभेची फक्त एका जागा देत निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. तर आम आदमी पक्ष सहा जागांवर निवडणूक लढवणार आहे.

पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. ‘आप’ने गोव्यातील एका आणि गुजरातमधील दोन लोकसभा जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

आपने दिली अशी ऑफर

आम आदमी पक्षाचे नेते संदीप पाठक यांनी म्हटले आहे की, आम्ही काँग्रेसला दिल्लीतील एका जागेवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर आम आदमी पार्टी दिल्लीत सहा जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसने या प्रस्तावाला वेळेवर प्रतिसाद न दिल्यास आम आदमी पक्ष सहा जागांवर आपले उमेदवार जाहीर करेल, असेही संदीप म्हणाले.

आम आदमी पार्टीचे खासदार संदीप पाठक म्हणाले की,’ आमच्या काँग्रेस पक्षासोबत जागावाटपाबाबत दोन अधिकृत बैठका झाल्या पण या बैठकांचा काहीही परिणाम झाला नाही. या दोन अधिकृत बैठकांव्यतिरिक्त गेल्या महिनाभरात अन्य कोणत्याही बैठका झालेल्या नाहीत.’

‘आम्ही पुढच्या बैठकीची वाट पाहत आहोत, काँग्रेसच्या नेत्यांनाही पुढच्या बैठकीची माहिती नाही. आज मी जड मनाने इथे बसलो आहे. आम्ही आसाममधून तीन उमेदवार जाहीर केले आणि मला आशा आहे की भारत आघाडी त्यांना स्वीकारेल.’

बिहारमध्ये झटका

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत पुन्हा राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा झटका लागला आहे. बिहारमध्ये आता भाजप आणि जेडीयूचे सरकार स्थापन झाले आहे. ज्यामुळे आरजेडी आणि काँग्रेस सत्तेबाहेर गेले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये ही धक्का

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा आधीच केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतून तृणमूल काँग्रेसही बाहेर पडला आहे.

भाजपकडून जुन्या मित्रपक्षांना साद

भाजपकडून मात्र जुन्या मित्रपक्षांना सोबत घेण्याची तयारी सुरु आहे. प्रादेशिक पक्षांना सोबत घेत देशात एनडीएला ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा नारा पंतप्रधान मोदी यांनी दिला होता.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.