‘कोण आहेत राहुल गांधी…पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का?’, मोदींना खुल्या चर्चेचे आमंत्रण दिल्यानंतर भाजपने केला पलटवार

BJP On Rahul Gandhi's Open Debate : अमेरिकन निवडणुकीत आणि इतर अनेक देशांच्या निवडणुकीत विरोधी आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये अनेक मुद्यांवर खुली चर्चा होते. काँग्रेस नेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुल्या चर्चेच निमंत्रण दिले. त्यावरुन आता वादाला तोंड फुटले आहे.

'कोण आहेत राहुल गांधी...पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का?', मोदींना खुल्या चर्चेचे आमंत्रण दिल्यानंतर भाजपने केला पलटवार
खुल्या चर्चेच्या निमंत्रणावरुन वाद
Follow us
| Updated on: May 12, 2024 | 3:52 PM

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मदी यांना खुल्या चर्चेचे निमंत्रण दिले आहे. तर या चर्चेपूर्वची वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या या प्रस्तावावर भाजपने तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे. केंद्रीय मंत्री आणि अमेठी येथील भाजपचे लोकसभेचे उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे खुल्या चर्चेपूर्वीच वादाने या मुद्याचा श्रीगणेशा झाला आहे.

स्मृती इराणींची जहरी टीका

हे सुद्धा वाचा

“राहुल गांधी यांच्यात एका सामान्य भाजप कार्यकर्त्याविरोधात निवडणूक लढण्याची हिम्मत नाही. त्यामुळे त्यांनी शेखी मिरवू नये. दुसरी गोष्ट म्हणजे, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर चर्चा करण्यास येऊ इच्छितो, ती व्यक्ती INDIA आघाडीची पंतप्रधान पदाची उमेदवार आहे का?” अशी जहरी टीका स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

राहुल गांधी कोण आहेत?

भाजप नेते तेजस्वी सूर्या यांनी पण काँग्रेसवर पलटवार केला आहे. राहुल गांधी कोण आहेत, जे पंतप्रधानांशी खुली चर्चा करु इच्छितात? असा प्रश्न त्यांनी विचारला. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नाहीत. INDIA आघाडीची तर चर्चाच नको. त्यांनी अगोदर स्वतःला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावं. त्यांनी हे मान्य करावं की, त्यांच्या पक्षाच्या पराभावाला तेच जबाबदार असतील. त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांना खुल्या चर्चेचे निमंत्रण द्यावं असा टोला तेजस्वी सूर्या यांनी लगावला.

ते तर पंतप्रधानाचा चेहरा पण नाहीत

भाजप आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी पण राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्याने राहुल गांधी यांचा उत्साह वाढला आहे. खुली चर्चा चांगली आहे. पण सध्याच्या पंतप्रधानांना राहुल गांधी यांच्याशी खुली चर्चा करण्याचे कारण काय? ते तर काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत आणि INDIA आघाडीचा चेहरा पण नाहीत, अशी टीका मालवीय यांनी केली.

काय म्हणाले होते राहुल गांधी

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. चांगल्या लोकशाहीसाठी देशातील प्रमुख पक्षांनी एकाच मंचावर आपले धोरण देशासमोर मांडणे एक सकारात्मक पाऊल ठरेल. काँग्रेस या विचारांचे स्वागत करते. तसेच चर्चेचे निमंत्रण स्वीकार करते. देशाच्या पंतप्रधानांनी पण या चर्चेत सहभागी व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.