AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कोण आहेत राहुल गांधी…पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का?’, मोदींना खुल्या चर्चेचे आमंत्रण दिल्यानंतर भाजपने केला पलटवार

BJP On Rahul Gandhi's Open Debate : अमेरिकन निवडणुकीत आणि इतर अनेक देशांच्या निवडणुकीत विरोधी आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये अनेक मुद्यांवर खुली चर्चा होते. काँग्रेस नेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुल्या चर्चेच निमंत्रण दिले. त्यावरुन आता वादाला तोंड फुटले आहे.

'कोण आहेत राहुल गांधी...पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का?', मोदींना खुल्या चर्चेचे आमंत्रण दिल्यानंतर भाजपने केला पलटवार
खुल्या चर्चेच्या निमंत्रणावरुन वाद
| Updated on: May 12, 2024 | 3:52 PM
Share

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मदी यांना खुल्या चर्चेचे निमंत्रण दिले आहे. तर या चर्चेपूर्वची वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या या प्रस्तावावर भाजपने तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे. केंद्रीय मंत्री आणि अमेठी येथील भाजपचे लोकसभेचे उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे खुल्या चर्चेपूर्वीच वादाने या मुद्याचा श्रीगणेशा झाला आहे.

स्मृती इराणींची जहरी टीका

“राहुल गांधी यांच्यात एका सामान्य भाजप कार्यकर्त्याविरोधात निवडणूक लढण्याची हिम्मत नाही. त्यामुळे त्यांनी शेखी मिरवू नये. दुसरी गोष्ट म्हणजे, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर चर्चा करण्यास येऊ इच्छितो, ती व्यक्ती INDIA आघाडीची पंतप्रधान पदाची उमेदवार आहे का?” अशी जहरी टीका स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

राहुल गांधी कोण आहेत?

भाजप नेते तेजस्वी सूर्या यांनी पण काँग्रेसवर पलटवार केला आहे. राहुल गांधी कोण आहेत, जे पंतप्रधानांशी खुली चर्चा करु इच्छितात? असा प्रश्न त्यांनी विचारला. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नाहीत. INDIA आघाडीची तर चर्चाच नको. त्यांनी अगोदर स्वतःला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावं. त्यांनी हे मान्य करावं की, त्यांच्या पक्षाच्या पराभावाला तेच जबाबदार असतील. त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांना खुल्या चर्चेचे निमंत्रण द्यावं असा टोला तेजस्वी सूर्या यांनी लगावला.

ते तर पंतप्रधानाचा चेहरा पण नाहीत

भाजप आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी पण राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्याने राहुल गांधी यांचा उत्साह वाढला आहे. खुली चर्चा चांगली आहे. पण सध्याच्या पंतप्रधानांना राहुल गांधी यांच्याशी खुली चर्चा करण्याचे कारण काय? ते तर काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत आणि INDIA आघाडीचा चेहरा पण नाहीत, अशी टीका मालवीय यांनी केली.

काय म्हणाले होते राहुल गांधी

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. चांगल्या लोकशाहीसाठी देशातील प्रमुख पक्षांनी एकाच मंचावर आपले धोरण देशासमोर मांडणे एक सकारात्मक पाऊल ठरेल. काँग्रेस या विचारांचे स्वागत करते. तसेच चर्चेचे निमंत्रण स्वीकार करते. देशाच्या पंतप्रधानांनी पण या चर्चेत सहभागी व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत