AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मिळाले दोन नवे निवडणूक आयुक्त, कोण आहेत नवे आयुक्त

Adhir Ranjan Chowdhury on New Election Commissioner: लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून समितीने निवड केल्याची माहिती लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली.

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मिळाले दोन नवे निवडणूक आयुक्त, कोण आहेत नवे आयुक्त
Election Commission
| Updated on: Mar 14, 2024 | 2:45 PM
Share

नवी दिल्ली | 14 मार्च 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने १४ मार्च रोजी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू (बलविंदर संधू ) यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली, असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पॅनेलच्या बैठकीनंतर माध्यमांना सांगितले. आता या नावांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंतिम निर्णय घेतली. त्यानंतर अधिसूचना  काढण्यात येणार आहे. दरम्यान या प्रक्रियेसंदर्भात आपण असंतुष्ट असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले.  निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी नवीन नियुक्तीचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी नवीन कायद्यानुसार पुनर्गठन करण्यात आलेल्या या पॅनेलच्या पहिल्या नियुक्त्या आहेत. भारताच्या सरन्यायाधीशांना सोडून निवड समितीमध्ये आता पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि नियुक्त केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांचा समावेश आहे.

ज्ञानेश कुमार केरळमधील तर संधू पंजाबचे

ज्ञानेश कुमार हे केरळमधील तर सुखबीर संधू हे पंजाबमधील आहे. सुखविंदर संधू हे उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि NHAI चे चेअरमन राहिले आहेत. ज्ञानेशकुमार १९८८ बॅचचे केरळचे आयएएस अधिकारी आहेत.यापूर्वी ते गृहमंत्रालयात होते. कलम ३७० संदर्भात निर्णय घेताना ते गृहमंत्रालयात होते.

आपल्याकडे दिली होती २१२ नावे

आपल्याकडे २१२ नावे एका दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे रात्रभर मी विचार करत राहिलो. दुसऱ्या दिवशी सहा नावे माझ्याकडे दिली आहे. त्यानंतर आपण या प्रक्रियेबाबत असंतुष्ट असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची नावे समितीने निश्चित केली आहे. आता ही नावे राष्ट्रपतीकडे जातील. त्यानंतर राष्ट्रपती या नावांवर अंतिम मोहोर उमटवतील.

फेब्रुवारीमध्ये अनुप पांडे यांच्या निवृत्तीनंतर आणि गोयल यांच्या राजीनाम्यानंतर, तीन सदस्यीय निवडणूक आयोगामध्ये आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार राहिले होते. गोयल, ज्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत होता, परंतु त्यांनी 9 मार्च रोजी राजीनामा दिला.

Follow Us
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी.
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय.
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट...
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट....
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल.