AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मिळाले दोन नवे निवडणूक आयुक्त, कोण आहेत नवे आयुक्त

Adhir Ranjan Chowdhury on New Election Commissioner: लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून समितीने निवड केल्याची माहिती लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली.

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मिळाले दोन नवे निवडणूक आयुक्त, कोण आहेत नवे आयुक्त
Election Commission
| Updated on: Mar 14, 2024 | 2:45 PM
Share

नवी दिल्ली | 14 मार्च 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने १४ मार्च रोजी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू (बलविंदर संधू ) यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली, असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पॅनेलच्या बैठकीनंतर माध्यमांना सांगितले. आता या नावांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंतिम निर्णय घेतली. त्यानंतर अधिसूचना  काढण्यात येणार आहे. दरम्यान या प्रक्रियेसंदर्भात आपण असंतुष्ट असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले.  निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी नवीन नियुक्तीचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी नवीन कायद्यानुसार पुनर्गठन करण्यात आलेल्या या पॅनेलच्या पहिल्या नियुक्त्या आहेत. भारताच्या सरन्यायाधीशांना सोडून निवड समितीमध्ये आता पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि नियुक्त केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांचा समावेश आहे.

ज्ञानेश कुमार केरळमधील तर संधू पंजाबचे

ज्ञानेश कुमार हे केरळमधील तर सुखबीर संधू हे पंजाबमधील आहे. सुखविंदर संधू हे उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि NHAI चे चेअरमन राहिले आहेत. ज्ञानेशकुमार १९८८ बॅचचे केरळचे आयएएस अधिकारी आहेत.यापूर्वी ते गृहमंत्रालयात होते. कलम ३७० संदर्भात निर्णय घेताना ते गृहमंत्रालयात होते.

आपल्याकडे दिली होती २१२ नावे

आपल्याकडे २१२ नावे एका दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे रात्रभर मी विचार करत राहिलो. दुसऱ्या दिवशी सहा नावे माझ्याकडे दिली आहे. त्यानंतर आपण या प्रक्रियेबाबत असंतुष्ट असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची नावे समितीने निश्चित केली आहे. आता ही नावे राष्ट्रपतीकडे जातील. त्यानंतर राष्ट्रपती या नावांवर अंतिम मोहोर उमटवतील.

फेब्रुवारीमध्ये अनुप पांडे यांच्या निवृत्तीनंतर आणि गोयल यांच्या राजीनाम्यानंतर, तीन सदस्यीय निवडणूक आयोगामध्ये आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार राहिले होते. गोयल, ज्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत होता, परंतु त्यांनी 9 मार्च रोजी राजीनामा दिला.

Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.